आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे !!
ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा!! (संत तुकाराम).
देवा देवपण देणे हे कलाकारांचे असे कर्तव्य ,
संतांची संगती ठरवी देवाचं गंतव्य .
विठ्ठल रुखमाचे मुले चार मुक्ता ज्ञाना सोपा निवृती यांचा सोपा विचार .
नरसी ते घुमान नामा फडकविली पताका ,पाथरी ते शिर्डी गेली साईची नौका.
भंडारा डोंगरी तुका गाई भागवत , एकनाथ पैठणचा असे दत्ताचा भक्त .
जांब समर्थाचे भांडवल हे मन , देवगिरी जनार्दन पुजे दत्तध्यान .
भजे विष्णू, शिव, शक्ती आणि नाथजन, अखंड ज्यांची कीर्ती लाभले कलियुगी भोळेपण .
करती जे वर्तमानाचे उत्तम आकलन आणि घडवी नाम संकीर्तन.
मीरा , गोरा, चोखामेळा , सावता, नरहरी अन् निळा.
जीवनी ज्यांनी रचिला नाम सोहळा.
आजच्या गणांना नाही उरला फार वेळ , सार त्यासाठी मनाचे श्लोक आणि हरिपाठ सरळ .
म्हणे कुसुमाग्रज शिवा , ध्यानी ठेवावा हा ठेवा .
गायिलेल्या कथा "गाथासार" नामासाठी जपावा.
No comments:
Post a Comment