Wednesday, November 18, 2015

सांस्कृतिक आक्रमणे ओळखा

जुन्या काळात  सतीप्रथा , बालविवाह यांना विरोध करणारे आज कसेकाय लहान मुलांना संभोगाच्या शिक्षणाच्या नावाखाली उघडेनागडे करू शकतात हा माझा प्रश्न आहे
ज्यांना आजही जग त्या देशाच्या राजाराणीमुळे ओळखते त्यांनीच भारतातील राजेशाही संपविली काही पचत नाही आणि आजही काही उदारमतवादी तरुण म्हणताना आढळतात इंग्रज आले म्हणुन भारतात रेल्वे आली नाहीतर...
अरे पण येथील वस्तुविनिमय पद्धती जेथे शेतकरी उत्पादक आणि विक्रेता दोन्ही होता ती पद्धती बंद करुन येथील शेतकऱ्यांना नेहमी साठी मारवाडी , व्यापारी यांच्या ताब्यात देणारेही तेच इंग्रज कोणाला का दिसु नयेत 
कारण सध्या जागतीक भाषा english आहे. म्हणुन सगळ्या गोष्टींचे इंग्रजीत decoding (भाषांतर म्हणा हव तर ) चालु आहे आणि इंग्रज कसे महान होते ते लिहीणारे लेखक त्या काळापासुन आजही भरभराटीस आलेले आहेत 
अरे या मिञ देशांसोबत मैञी म्हणजेच मुळात भांडवलशाहीला आमंञण जे की पाश्चिमात्यांचे जगण्यासाठीचे साधन आहे 
याउलट पौर्वात्य देश जेथे समाजवाद म्हणजे जीवन आहे तेथेच जनता सुखी समाधानी आहे आणि भारत कृषिप्रधान देश असल्याने येथे समाजवादाला प्राधान्य असलेच पाहीजे 
तसेच जर आम्ही अजुन खोलात जाण्याचा विचार केला तर दाक्षिणात्य राज्ये हिंदी भाषेच्या वापरासही विरोध करतात अशी परिस्थिती आहे 
आणि आम्हा महाराष्ट्रातील माणसांचे काय सांगावे पंजाबी प्रांतात आम्हाला मद्रासी समजले जाते तर कानडी, तामीळ लोकांसाठी आम्ही north indian आहोत ,जातानाही divide & rule (फोडा आणि झोडा) एकदम व्यवस्थित बसवुनच english कार्यकर्ते फरार झाले. पण त्यांची संस्कृती आजही आपण  पाळतो  आहोत याचा आपण विचार केला पाहिजे