Saturday, January 28, 2017

चित्रपट विविधता आणि गुणधर्म

आजच्या जगात चित्रपट हे मध्यम आणि मनोरंजन् व्यवसायाचे एक प्रभावी शस्त्र आहे. तरीही जगात प्रत्येक ठिकाणच्या चित्रपटांविषयी तुलनात्मक माहिती आपण प्रामुख्याने सांगू शकतो उदा. चीनच्या कोणत्याही चित्रपटात कुंग फु असतेच . कितीही प्रयत्न केला तरी बॉलीवूड च्या चित्रपटातून आपण प्रेम नावाचा प्रकार आपल्याला काही अंशी का होईना दाखवलेलाच दिसतो. तर प्राथमिक मुद्दा असा कि हॉलीवूड चे चित्रपट ह्यांचा मुल गुणधर्म आहे निर्माण (प्रत्येक चित्रपटात निर्माण किंवा मानवनिर्मित गोष्टींना ज्या आज अस्तित्वात आहेत ) ते प्रत्येक गोष्टीत दाखवून देतात कि मानव काय निर्माण करू शकतो त्याने काय काय निर्माण केले त्याची बुद्धी कशी चालते इत्यादी . तर भारतीय चित्रपटात भावना महत्वाची तत्व महत्वाचे (इतिहासातही  डोकावून बघणारे सर्व चित्रपट हे नाही दाखवत कि काय काय निर्माण झाले  ) जरी कितीही चित्रपटात  निर्माण दाखवले तरी माणसाची ओळख , मुत्सद्देगिरी ,तत्व ,ह्या गोष्टी त्या निर्माणावर मात करून जातेच. आणि सहसा माणसामाणसांतील वाद , वैमनस्य , त्याची कारणे हे अत्यंत चांगल्या रीतिने येथे दाखवले जाते.   
   म्हणूनच कि काय येथील मनामनात त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीपुजक देशात, जास्त अधिकार असलेल्या माणसाला (गटप्रमुख)येथे गटाचे मालक समजले जाते, मुळात तोही गटाचा (team) एक हिस्सा असतो हे कुणी मानतच नाही . तर हॉलीवूड मध्ये जरी गटप्रमुख दाखवला गेला तरी त्याच्या तोडीचे अनेक माणसे आपल्याला विवध ठिकाणी काम करतांना दिसतात .
संस्कृतीचे दर्शन आपल्याला याच चित्रपटांद्वारे घडते उदा.फ़क़्त परिणाम हा होतो कि निर्माण गाभा असलेल्या हॉलीवूड मध्ये रीतसर एखाद्या निर्माणाच श्रेय दुसरे कसे घेतात तसेच जे निर्माण करूनही जर त्याचे श्रेय न भेटल्याने वाईट मार्ग स्वीकारतात आणि वाईट ठरवले जातात हे ठसवले गेले असल्याने प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी धडपड करत असतो. 
आणि बॉलीवूड मध्ये अथवा सर्व भारतीय चित्रपट असे दाखवून देतात कि काही महत्वाकांक्षी लोकांमुळे जरी एखाद्या माणसाची प्रतिमा मलीन केली गेली तरी येथील माणसे प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय देण्याच्या मार्गाने विचार करतात आणि त्यांना कळत कि यात मुळ श्रेय कोणाच असेल म्हणूनच कि काय आज श्रेय कोणीही घेतले तरी काही फरक पडत नाहि तसेच  आज जगाला तोडणारे कितीही मुद्दे असले तरी ते आपण खोडून काढून किंवा ते न करताही जगू शकतो.
तरीही याचा उलट वापर होतो हे हि धरून चालावेच लागते आणि असा वापर बुद्धीजीवी लोकच करतात आणि ते लोकं हे हि विसरून जातात कि आपल्याला भेटलेल्या प्रसिद्धीचा कोणाची निंदा करण्यासाठी वापर करणे आपल्या प्रसिद्धी साठी धोकादायक तर आहेच तसेच तुमची निंदा करणारेही तयार होतात याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल 
आपले मत मांडण्याचे माध्यम म्हणून जरी बुद्धीजीवी याकडे बघत असले तरी इतिहास बदलण्याचे साधन म्हणून याकडे बघू नये(भले ते श्रेय हस्तांतरण असेल किंवा बदनामी असेल ) हि माझी अपेक्षा !!!

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम