Wednesday, September 9, 2015

राजे राज्य तेव्हाच करतील जेव्हा मावळ्यांमध्ये जिव्हाळा असेल

       


        या दंडकारण्यात अनेक राजे जन्मले आणि राज्य करून त्यांच्या गोष्टी ,कहाण्या मागे सोडून गेले
पण तरीही फार क्वचितच आहेत जे सर्वांच्या मनात घर करून गेले .
        साम ,दाम, दंड, भेद  या माणसाने व्यवहारासाठी आखून ठेवलेल्या रेषा आहेत.
या दंडकारण्यात दामाने व्यापारी आणि भेदाने पुजारी राज्य करून गेले, दंड या राज्याचा पाया आहे म्हणून दंडाचे राज्य चालूच राहील, पण जो येथे सामावादासाठी संवाद साधतो त्याची गरज नेहमीच राहिली आणि राहीलही.  
       तसेच दंडाने आणखी एक गोष्ट साध्य झाली आहे ती म्हणजे उठाव , सत्तेत असणाऱ्या विरुद्ध उठाव करणाऱ्यांची येथे कधीच उणीव भासली नाही म्हणजे दंडकारण्य बदलास कारणीभूत ठरते. पण जर आजच्या जगाची गोष्ट असेल तर लोक आता तुमच्या मागे किती आहेत या पेक्षा तुमच्या सोबत किती आहेत हे बघतात आपल्यासारखे जीव निर्माण करण्याची जाणीव आपल्याला  निर्मात्याने दिली आहे पण आपल्यासारखे माणसे निर्माण करण्याची जाणीव आज आपल्याला नसावी हि बाब  तर्कशास्त्रात बसत नाही विचारांनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच  करावे लागतात हि गोष्ट जरी खरी असली तरी माणसाने कसे आणि कशासाठी जगावे हे शिकवणे गरजेचे होते म्हणून या रूढी, प्रथा ,परंपरा जिवनात आल्या तरीही वाईट जुन्या चालीरीती टाकून देऊन नवीन रिती शिकणे तसेच आदर्श गोष्टी पुढे चालू ठेवणे म्हणजे प्रबोधन,प्रबोधन हि एक आवर्त संकल्पना आहे जसे विज्ञानात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही तसेच प्रबोधनहि कधी थांबणार नाही.  आज आपण global village हि संकल्पना ऐकतो तेव्हा आपण असे मानू कि आज जगाला जोडणारे जगाचे राजे आहेत भले प्रत्येक देश स्वतःच्या राजाला प्रधानमंत्री , हुकुमशहा,राजा, सम्राट काहीही उपमा देवोत पण जर त्यांनी जगाशी संबंध तोडण्याचे प्रयत्न केले तर त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद आता सर्वसामान्यामध्ये आज आहे आणि जरी राजेशाही पुन्हा आली तरी राज्यक्रांतीला सोबत घेऊनच येईल
म्हणून जर सर्व जनतेत राजाबद्दल जिव्हाळा असेल तोवर तो राजा राहील
आज एवढेच
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

      

No comments:

Post a Comment