Tuesday, August 25, 2015

माणसाची गोष्ट

माणसाची गोष्ट

         माणूस माकडापासून विकसित झाला असे बरेच विद्वान म्हणतात . तो विकसित होताना त्याच्यामध्ये अनेक  बदल झाले ,ते कशा रीतीने झाले हे मांडण्यासाठी हा लेख .
           माणूस अगोदर एकटा होता म्हणून जगणे आणि उपजणे एवढेच त्याचे काम . पुढे तो विचार करू लागला पण एकांतात ,आपल्यासारखाच कि जग कसे निर्माण झाले असावे आपण कसे जगतो आहे वगैरे वगैरे(तो विचार कसा करू लागला हा संशोधनाचा विषय आहे असो ) प्रथम तो एकटाच विचार करत असे म्हणून अनुभव(experience ) आणि स्मृती (memory )यांच्या  जोरावर त्याने जगणे वाढवले  पुध्ये एकासमोर एक असे अनेक विचार करणारे एकत्र आले आणि संभाषण कौशल्यांची निर्मिती झाली सुरुवातीला अमौखिक अलिखित (हातवारे, हालचाली ) नंतर मौखिक (बोलीभाषा) पुढे चीन्हांपासून लिखित संभाषण आणि आज  मौखिक  लिखित (speech to  text ) संभाषणापर्यंत मानव आला आहे.
    पण प्रथम माणसे जेव्हा संभाषण करत तेव्हा ते आपल्या जीवनातील काहीच पण प्रभावी प्रसंग मांडत असत . त्यामुळे माणसे जिवांतील सर्व प्रसंग क्वचितच मांडू शकत पण जीवनातील रहस्यमय प्रसंग म्हणजे आपण केलेले प्रवास आणि म्हणून पुढे प्रवासवर्णनांची भर पडली. पण प्रसंग आठवून तो सांगणे म्हणजे सांगणाऱ्याची भाषा ,त्याचा बघण्याचा दृष्टीकोण याचा प्रभाव त्यात असे. आणि त्याचे प्रत्येक वेळी वक्त्यानुसार पुनर्न्विकरण  व्हायचे(randome access memory) , म्हणून पुढे तंतोतंत माहिती प्रसारासाठी लिखित म्हणजे (read only memory) साहित्य ज्याला आज शास्त्र , वेद ,वांग्मय  अशा नावांनी संबोधले जाते त्याची सुरुवात झाली असावी . त्यातही प्रभावी प्रसारासाठी लिखित साहित्याकडून चित्रकलेकडे विचारवंत माणसे वळली .
  तसेच पुढे चालून या चित्र कलेचेच रुपांतरण चलत्चिञ म्हणजे चित्रपटात झाले  आज video पाहणे,पाठवणे, आणि बनमाहिविणे सहज सोपे झाले आहे म्हणून माहिती प्रसार वेगाने होत  
  तरीही अभ्यासक म्हणून विचार केला तर लक्षात येते की हे माध्यम जरी प्रखर आहे पण त्यातील ञुटी लक्षात येतील अशा आहेत 
   उदा. प्रत्येक माध्यम privacy(वैयक्तिक जीवन जगण्याची मुभा ,गुप्तता ) आणि piracy ( चाचेगिरी) ह्या ञूटींचा सामना करत असते पण इथे प्रभाव थोडा जास्तच आढळतो आणि चित्रपटमाध्यमाला लागते ती silicon semiconductor ne बनलेली मेमोरी ह्यात जशी माहिती साठवली जाते तितक्याच सहजतेने ती मिटवली पण जाते 
   म्हणजे कागदावर साठवलेल्या माहितीपेक्षा याची जास्त काळजी घेण्याची गरज असते आणि सुरक्षितता कमी आहे तरीही या प्रखर माध्यमाचा वापर केला जावा आणि यातुन जमा झालेल्या माहिती सर्वांना उपलब्ध असावी यापासुन कोणालाच वंचित ठेवण्याची अपेक्षाही ठेवु नये 
  जय हिंद!!! जय महाराष्ट्र !!!

No comments:

Post a Comment