गावाकडे दिवाळीला जाण्याचा प्रसंग आला .
गावामध्ये जेव्हा सण समारंभ असतात तेव्हा लोक पर्यटन क्षेत्र म्हणतात , तेथील वातावरणाचा आनंद मिळतो .
कारण अनेक ठिकाणचे आमच्यासारखे लोक तिथे एकत्र येतात प्रत्येकाचे रहाणीमान बोली वेगळी असते आणि गाव आणि तेथील लोक त्यांना सामावून घेतात.
तसेच गावात गप्पा आणि बैठका तशा रोजच्याच पण अशा काळात विशेष करून बाहेरून आलेले लोकही त्याचा भाग होतात.
अशाच बैठकीत जेव्हा हा नवीन शेती कायदा सगळीकडे प्रकाशझोतात होता ,तेव्हा हा विषय निघाला आणि आम्ही त्यात साहजिकच सहभागी झालो. काही तपशिलांसह बैठकीत उपलब्ध सर्व गोष्ट खाली मांडत आहे .
काही लोक सहजच गाव आणि शहर यातील पैशाचा फरक पाहून शहराकडे आकर्षित होतात ,
पण शहरात खर्च तेवढाच आहे म्हणून शहरातील पगार नावाची गोष्ट आणि गावातील उत्पन्न किंवा जे कोणी कारखान्यात काम करत आहेत त्यांचा पगार यात तफावत नक्कीच आहे . आणि त्याचे कारण म्हणजे कारखाने स्वतःची वीज खरेदी करतात असे नाही (तिथे power plant असतो) म्हणजे तेथील कामगारही पूर्णपणे वीजखर्चमुक्त असतो जो शहरात पगाराच्या १०% तरी असतो.
त्यात भर म्हणजे शहरातील फॅक्टरी २४*७*३६५ चालूच असते पूर्ण बंद ती कधीच केली जात नाही (सर्व बंद असताना डागडुजी आणि विस्तार कार्य चालूच असते पण पूर्णपणे बंद नाही होत ). तसेच शहरेही २४ तास चालूच असतात.
याउलट गावात जरी २४ तास गावातील लोक काम चालू ठेवतात पण बाहेरील जगाशी काही सोयीसुविधांअभावी संबंध तुटतो (दळणवळण ) .
आणि कारखाने बोलाल तर प्रथम वरवर कच्चा माल हे कारण धरून ते ६-७ महिने चालतात असे कळलं पण त्यातही दळणवळण हे दुय्यम का होईना कारण होतेच .
उरलेले ४-५ महिने हे पावसाळा आणि शेतात काम करणारे मजूर यांचे असतात .
मूळ मुद्दा असा होता कि,
जर अडाणी (तो व्यापारी जो modern कणग्या बनवून सगळ्यात मोठा शेतकरी बनू पाहतो )
गावात काही बदल करायला आला तर तो काय विचार करत असेल .
१) गावात सगळ्या सुविधा आल्या तर गावही शहराप्रमाणं २४ तास चालवता येतील;
२) जसे कि कारखाने सध्या कोणत्याही कारणाने ४-५ महिने बंद असतात ते २ महिन्यांवर येतील कारण डागडुजी आणि विस्तार हे काम कमीत कमी २ महिन्यात पूर्ण होऊ शकते (source : Engineer - power plant ).
३) हा फक्त या वाढलेल्या वेळेचा नफा जो आहे जो शेतकऱ्यांना मिळू शकत होता तो अडाणीला मिळेल .
४) लॉजिस्टिक - कृषी उत्पन्न बाजार समिती ( जी आज सरकारी, सहकारी आहे ) जी सर्व व्यवस्था सांभाळते तिला खाजगी पर्याय अडाणी आणू शकतो जो साहजिकच त्याच्या फायद्याचा निर्णय असेल .
बाकी जग आणि गाव एकत्र होते आणि राहतील पण गावांचं गावपण शाबूत राहावं एवढच .
No comments:
Post a Comment