Friday, December 25, 2015

जीवन एक चक्र आणि आजची असहिष्णुता

तर मित्रांनो या जीवनात काय काय होऊ शकते याची कल्पना आपल्याला येतच असते 
तरी जीवन हे एक चक्र आहे ते कोणासाठीही थांबत नाही पण त्यात असे काय होऊ शकते कि ज्याने चक्र चालू राहते

याबद्दल मनातील  विचार या ठिकाणी मांडतो आहे
कल्पनेच्या विश्वात आमची मजल तुम्हाला अर्पण

सुरुवात कशी झाली हे प्रत्येक जण सांगतो आपापल्या परीने
तरी आमच्या पुराणात (माणसाची गोष्ट ) सांगितल्या प्रमाणे वात शीला आणि जल यांच्या नंतर जीववरण तयार झाले

या जीवांना कसे जगावे हे शिकवण्यासाठी काही तुमच्या आमच्या सारख्याच कल्पना करू शकणाऱ्यां जीवांनी
औम कारापासून तर नृत्य , गायन वादन अशा 64 कला पर्यन्त आणि 7 तत्व आणि 4 वेदांपासून ते 4 वादांपर्यंत (साम दाम दंड भेद )
तसेच knowlegde पासून तर physics ,chem. , maths , bio, electron ,proton etc . सर्व तयार केले

याचाच वापर करत करत सामान्य जीव
पुढे चालून हेच जीव विकसित झाले (जसे आपण माकडापासून ,कार्टून नेटवर्क वर  digimon, pokemon होतात ना तसेच  ) आणि ते पुढेही चालूच राहील (जसे dragon ball zee मध्ये , x-men मध्ये,twilight saga मध्ये  इत्यादी) 
पण माणसाला नेहमीच आकर्षण असते ते इतरांपेक्षा वेगळे बनण्याची आणि म्हणूनच
दशावतार ,विष्णूपुराण , justice league, avengers यासारखे नवीन कार्यक्रम ह्याच कल्पना विश्वात रमणाऱ्या जीवांनी तयार केले पण त्याचा परिणाम असा झाला कि सामान्य जीव त्याचाही वापर करू लागले आणि नकळत हेच जीव स्वतःचाच ह्रास करून घेऊ लागले

आणि नियमानुसार जसे आले ते तसे परत जाणार     जीव , जल, शीला, वात हे आपल्या सर्वाना माहिती आहे पण आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही ये म्हणूनच कि काय जर निर्माता असेल किंवा नसेलही तरी याच जीवांना काही कारण हवे असते अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणूनच यांनी सूरअसुर ,देवदानव ,सूर्यवंशी चंद्रवंशी ,ब्रम्हवंशी ,नागवंशी, हिंदू , मुस्लिम  दक्षिणउत्तर पूर्वपश्चिम तयार केले

आणि यात सामान्य जीवांची काय चूक कि त्यांनी याचाच वापर करून सर्वव्यापी जगाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष तुकडे करून घेतले

पण पुढे चालून अशी जीवही तयार झाली ज्यांच्या जिव्हाळ्याने म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा कल्पना सोडून न देता खरेखुरे साहित्यही याच कल्पनारम्य जीवांनी व्यक्तीचरीञ्यालाही कल्पनेची जोड देत रामायण ,महाभारत , बायबल, कुराण हे परिस्थिती नुसार  बदलत आणले

काही नग तर असेही निघाले
की एरवी एखाद्या भटाप्रमाणे तुम्ही आम्हाला सोडुन त्यांना मान का देता असे म्हणणारे हेच literal intelligentsia (बुद्धिजीवी हो !!!) जीव
धोक्यात घालुन दादरीच्या घटनेचा संबंध दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येशी लावतात आणि पुरस्कार वापसी करतात
यातलेच काही सांगतात की औरंगाबाद ला संभाजीनगर करने म्हणजे ईतिहास बदलण्यासारखे आहे (नेमाडे )
माझी कल्पना मला दाखवते की चालुच राहील

आम्ही सर्वप्रथम या जगात आलो आणि आम्ही या क्षेत्रातील मुलनिवासी हेच ठरविण्यात सामान्य जीवांचा असतीत्वासाठी संघर्ष चालुच राहील

आणि हेच बुद्धीजीवी त्यांनी निर्माण केलेल्या(ते किंवा त्यांची अभिव्यक्ती कारण असलेल्या ) युद्धप्रसंगी रडतील की आम्हाला मान मिळत नाहीये येथे असहिष्णुता (intolerance )वाढतेय  पण ते हे विसरतात की जर दोन प्रदेशांत युद्ध चालले असेल तर अभिव्यक्ती दडपली जाणे सहाजीक आहे यात विशेष काही नाही (when there was war started no one comes to see my shows hence I cremated my theater

ref. Film hugo of hollywood just watch for this  message

त्या माणसाला स्वतःच्या थिएटर ला आग लावावी लागली कारण युद्धामुळे  त्याला आणि त्याच्या कलेला मान मिळत नव्हता पण त्याने आजच्या बुद्धीजीवींप्रमाणे कधीच युद्धाला प्रसिद्धीसाठी हत्यार बणविले नाही )
असो

....
जर खरेच अभिव्यक्ती  माणसाला जगवत चलवात असेल तर एवढे ध्यानी ठेवावे की
पुढे चालुन तुमच्या हातांनीच देव आणि त्यांचेही युद्ध घडतील (x-Men  series मध्ये पुढच्या चिञपटात राम होता आणि स्वतःला कृष्णा सांगणारा खलनायक दाखवणार आहे असे म्हणतात हीच का ती अभिव्यक्ती 

काय भरोसा पुढे चालुन avengers त्याच दिशेने वळाले तर )

येथे एक मुद्दा अजुन येतो की जर ती अभिव्यक्ती नसुन संशोधन आहे

म्हणजे आपल्याच पुराणांचे english मध्ये decoding (आवृत्तीकरण
उदा. चंद्रवंशी आणि सुर्यवंशीच vampires आणि warewolf आहेत का???)किंवा एखाद्या सर्वव्यापी अपघातानंतर (जगबुडी , हिमयुग ) जगासमोर हीच अभिव्यक्ती पुराण, ईतिहास म्हणुन जगासमोर येईल तेव्हा पुन्हा जीवनाचे चक्र सुरु होईल आणि पुन्हा सामान्य जिवांचा असतित्वासाठी संघर्ष (आम्ही जुने, आम्ही मुलनिवासी) चालुच राहिल

तोपर्यंत जोपर्यंत जगात जिव आहेत आणि कदाचीत बाकी आवरणांचेही चक्र असेलच

संशोधन चालु आहे

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम    

No comments:

Post a Comment