Friday, October 30, 2020

शेती : - व्यवसाय की स्वयंरोजगार

आजवर जी शेतिबद्दलची विचारसरणी आहे त्यात घोळ असा आहे कि

 १) कम्युनिस्ट कामगारांचे हित बघते आणि ते शेतकऱ्यांना व्यावसायिक मानतात कारण त्यांच्या शेतात देखील कामगार असतात म्हणजे ते कामगार नाहीत हे पक्के असे त्यांचे मत आहे .

२) उजवी खाउजा (खाजगी,उदारी,जागतिकीकरण)  विचासरणीला शेतकरी शेतात पाहिजेत पण ते मालक म्हणून राहिले नाही पाहिजेत   कारण ते जर मालक राहिले तर हक्क हिस्सा नावाची गोष्ट तेथे  राहील  . 

आणि म्हणूनच होईल त्या मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या न राहता सरकार किंवा सहकार मालकीच्या व्हाव्यात जी त्यांची गरज आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात .

आता शेतकऱ्याची अवस्था खाजगी दुकानदारासारखी आहे दिवस काढला तर काही तरी हाती लागेल असा समज  घालून  तो मेहनत घेतो 

पण भविष्यात  त्याच्या नवमाध्यमवर्गीय वंशजांना शहरात जमीन कमी पडायला लागली तर ती भूक  शेती गिळेल एवढी नक्कीच आहे . 

अजून एक गोष्ट जी आमच्या कायम ध्यानात राहावी जोपर्यंत शेतमाल  हा शेतकऱ्यांच्या हातून आपल्याला येतोय तोपर्यंत तो तुमच्या आवाक्यात आहे . जर का एकदा शहरातील मॉल मध्ये तो कायमचा गेला तर औषधांएवढी किंमत मोजावी लागेल जेवणाला  पण .

बरच वर्षे शहरात राहून देखील आपण हे विसरू नये कि शेती हि कायम गावातच वाढणार शहरात फक्त परसबाग होईल झाली तर !!!




Monday, May 11, 2020

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे

लहानपणी एक गोष्ट ऐकली होती
कि वेगवेगळ्या दिशांनी पृथ्वी कोठे आहे याबाबत माहितीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत कोणी म्हणत होते की कासवाच्या पाठीवर, हत्तीच्या पाठीवर,
आणि आपल्याकडे कहाणी आहे की ती शेषनागाच्या मस्तकावर.
या गोष्टी भलेही काल्पनिक आहेत कारण सर्वजण विज्ञानानुसार जाणतात की सौरमाला आणि गुरुत्वाकर्षण यात पृथ्वी एक मैलाचा दगड आहे जेथे आपण राहतो.
पण या कल्पनेत एक मोलाचा सार आहे तो म्हणजे हत्ती, कासव,  शेषनाग हे जर पृथ्वीचा भार ऊचलतात तर ते पेलण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे कोणी ईतर ते पशू नाही ते पेलु शकते नाही त्यांच्या स्वभावात ते गुणधर्म आढळतात.
परिस्थिती कसलीही असो ते जे पृथ्वीचा भार वाहतात ते समाधान मानत असतात.

व्यवस्थेत जे भार वाहणारे  आहेत त्यांची संख्या तुलनेने त्यांच्यापेक्षा अधिक  आहे जे व्यवस्थापक किंवा व्यवस्थेत त्यांच्या वरच्या श्रेणीत आहेत.

संस्कृती आणि जन्म तसेच सहवास आणि अधिकार याद्वारे जे ज्या श्रेणीमध्ये पोहोचले आहेत ते परिस्थितीनुसार श्रेणी बदलतील पण भारवाहू हे नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहेत जरी ते संघटीत असतील किंवा असंघटित.

कारण व्यवस्था हे सांगते की निर्णय हे जे भार उचलतात ते घेत नाहीत कारण तो अधिकार त्यांना व्यवस्था देत नाही
ते तर व्यवस्थापकांनी केलेल्या निर्णयांना बांधील राहून सोपवलेली  कर्तव्ये पार पाडतात.
त्यांचे निर्णय बदलण्याची   क्षमता असलेल्या व्यवस्थापकाला अजून एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे त्यांच्या मनात असलेल्या प्रलोभने तसेच नाईलाज
यांची असलेली जाणीव. ही त्याला स्वतःला स्वतःचे निर्णय थोपवण्यात मदत करत असते.

अजुन एक गोष्ट म्हणजे भारवाहू हे एकत्र असतांना ते व्यवस्थेला पुरक अशाच गोष्टींचे समर्थन करतात.
(उदा.  उसतोड कामगार असो की आतंकी सैनिक ते आपापल्या व्यवस्थेविरूद्ध नाही जातात नाही ते कोणाकडून ऐकून घेऊ शकतात).

जन्म  से बैरागी जब संसार का हिस्सा होने चला तब यही कहने का अवसर मिला!!!

जब कभी धर्म और व्यवस्था के नाम पर अवडंबर होगा.
तब व्यवस्था बदली जाये ये अनिवार्य होगा!!!

कोई श्रेणी ही ना रहे ऐसा समय ही परिणाम होगा!!!
विधीविधान तुमसे जन्मे है तुम विधीविधान से नही ये आकलन हर हर महादेव की गुंज से होगा !!!

Tuesday, January 28, 2020

देवाला देव बनवणे हे कलाकारांच कर्तव्य आहे


एक गोष्ट नेहमीच वादाचा विषय बनते ती म्हणजे देव.

काही लोक म्हणतात की देवाने माणसाला बनवले तर काही ठिकाणी माणसाने ऊपासनेसाठी देव बनवले आहेत.
मुर्तीपुजक व्यवस्था अनेक नवीन देव कालानुरूप उदयास आणते.
आणि मग चालू होतो स्पर्धेचा खेळ, वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या रंगापासून तर विधी सेवा पर्यंत सर्व गोष्टी ठरवल्या जातात आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या आचरणात आणावे लागेल असे कडक नियम लादले जातात.
या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे सगळे प्रकार माहीत असतानाही ते रितसर पार पाडले जातात कारण येथे कलाकार आणि कलेला अपरंपार महत्त्व आहे.

विधी सेवा सुरू करताना तसेच ते व्यवस्थेच्या पायथ्याशी असलेल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचताना कलाकार महत्त्वाची भूमिका बजावतात.

ऊदा.  नवरात्रात 9 दिवस 9 रंग ठरवले गेले होते आणि ते कलाकारांकडून वर सांगितल्याप्रमाणे पोहोचले. काही ठिकाणी तर ते स्वतः पण त्या ठरवलेल्या रंगीत कपड्यात 9 दिवस विधीवत दिसले.
हे सहाजिकच आहे कारण येथे कलाकार हे संस्कृती जोपासताना किंवा नवी संस्कृती बनवतात आणि पैसे मिळवतात.
(Off course Artist are trend setters &  they receive money to develop culture.)

Safety Honor &  Welfare of your country comes first.

https://youtu.be/abO7kbJE2Lg?si=AG67BiXSfx0ZXlRX

Sudame & Subodh bhave (गोंदवलेकर महाराज)

Friday, February 16, 2018

सहस्त्रावधी समुदाय आणि माहिती प्रवाह

The millennial community is the community of people, which are born in the last decade of the millennium.
They are the last people of the history & first people of the future. So they must handle the ancient principles of man & also last future of man. I believe we need the more specific awareness of environment also. Generally, we follow DIKW rule for info with latest IT resources. the rule says
Data>>Info>>Knowledge >>Wisdom.
 Data is a set of values of qualitative or quantitative variables.
Info is meaningful set of data
Knowledge is a thought in the individual's mind, which is characterized by the individual's justifiable belief that it is true.
Wisdom is the ability to increase effectiveness

That indicates know- who, how, when is knowledge
& know-why is the wisdom

 so, beyond this, we are having nowadays AAA in IT for transfer of data those are anytime, anywhere, on any device & lastly people are working for 4th Any language

Technologically mediated information
It is estimated that the world's technological capacity to store information grew from 2.6 (optimally compressed) exabytes in 1986 – which is the informational equivalent to less than one 730-MB CD-ROM per person (539 MB per person) – to 295 (optimally compressed) exabytes in 2007.This is the informational equivalent of almost 61 CD-ROM per person in 2007.
The world’s combined technological capacity to receive information through one-way broadcast networks was the informational equivalent of 174 newspapers per person per day in 2007.
The world's combined effective capacity to exchange information through two-way telecommunication networks was the informational equivalent of 6 newspapers per person per day in 2007.
As of 2007, an estimated 90% of all new information is digital, mostly stored on hard drives


हजार वर्षांचा समुदाय हा लोकांचा समुदाय आहे, जे सहस्रावधीच्या शेवटच्या दशकात जन्माला येतात.
ते इतिहासाचे शेवटचे लोक आणि भविष्यातील प्रथम लोक आहेत. म्हणून त्यांनी मनुष्याच्या प्राचीन तत्त्वांचा आणि माणसाच्या शेवटच्या भविष्याचीही हाताळणी करावी. मला विश्वास आहे की आम्हाला पर्यावरणाबद्दल अधिक विशिष्ट जाणीव देखील आवश्यक आहे. सामान्यत :, आम्ही नवीनतम आयटी संसाधनांसह माहितीसाठी DIKW नियमांचे अनुसरण करतो. नियम म्हणते
डेटा >> माहिती >> ज्ञान >> शहाणपण
 डेटा गुणात्मक किंवा परिमाणवाचक परिवर्तनाच्या मूल्यांचा संच आहे.
माहिती डेटाचा अर्थपूर्ण संच आहे
ज्ञान व्यक्तीच्या मनात एक विचार आहे, ज्याला व्यक्तिच्या योग्यतेवर विश्वास आहे की हे सत्य आहे.
शहाणपण म्हणजे प्रभावीपणाची क्षमता

त्यावरून हे सूचित होते की - कोण, कशाप्रकारे, ज्ञान कधी आहे
आणि ज्ञान-शहाणपणा का आहे?

 त्यामुळे, याहूनही पुढे, आम्ही आजकाल एएए आयटी मध्ये डेटाच्या स्थानांतरणासाठी, कोणत्याही वेळी, कोणत्याही डिव्हाइसवर आणि शेवटी लोक 4 था कोणत्याही भाषेसाठी काम करीत आहेत.

तंत्रज्ञानात मध्यस्थीची माहिती
असा अंदाज आहे की माहिती साठवण्याकरिता जगातील तांत्रिक क्षमता 1 9 86 पासून 2.6 (ऑप्टिमायसी कंपार्टेड) एक्बाबाईट्सने वाढली आहे - जी एक व्यक्ती 730 एमबी सीडी-रॉम प्रति व्यक्ती (प्रति व्यक्ति 539 एमबी) पेक्षा कमीत कमी 2 9 5 पर्यंत माहितीपूर्ण आहे संकुचित) 2007 मध्ये एक्बाबाइट्स. हे 2007 मध्ये जवळजवळ 61 सीडी-रॉम प्रति व्यक्ती माहितीचे समतुल्य आहे.
1-मार्से ब्रॉडकास्ट नेटवर्क्स द्वारे माहिती मिळविण्याकरिता जगण्याची एकत्रित तांत्रिक क्षमता ही प्रति व्यक्ती प्रति दिन 174 वृत्तपत्रांची दररोज माहिती असते.
2007 मध्ये प्रति व्यक्ती दररोज 6 वृत्तपत्रांच्या माहितीच्या बरोबरीने दोन-वे दूरसंचार नेटवर्कद्वारे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी जगातील एकुण प्रभावी प्रभावी क्षमता होती.
2007 नुसार, सर्व नवीन माहिती अंदाजे 90% डिजिटल आहे, मुख्यतः हार्ड ड्राइववर संग्रहित केली जाते.



सहस्राब्दी समुदाय लोगों का समुदाय है, जो सहस्राब्दी के अंतिम दशक में पैदा होते हैं।
वे इतिहास के अंतिम लोग हैं और भविष्य के पहले लोग हैं। इसलिए उन्हें मनुष्य के प्राचीन सिद्धांतों और मनुष्य के अंतिम भविष्य को भी संभालना चाहिए। मेरा मानना है कि हमें पर्यावरण के बारे में अधिक विशिष्ट जागरूकता की आवश्यकता है। आम तौर पर, हम नवीनतम आईटी संसाधनों के साथ जानकारी के लिए डीआईकेडब्ल्यू नियम का पालन करते हैं। नियम कहता है
डेटा >> सूचना >> ज्ञान >> बुद्धि
 डेटा गुणात्मक या मात्रात्मक चर के मूल्यों का एक समूह है
जानकारी डेटा का सार्थक सेट है
ज्ञान व्यक्ति के दिमाग में एक विचार है, जिसे व्यक्ति के उचित विश्वास से दर्शाया जाता है कि यह सच है।
बुद्धि प्रभावशीलता बढ़ाने की क्षमता है

यह पता चलता है कि पता है - कौन, कैसे, कब ज्ञान है
और जानिए- ज्ञान क्यों है

 इसलिए, इसके अलावा, हम आजकल एएए इन आंकड़ों के हस्तांतरण के लिए कर रहे हैं, वे किसी भी समय, कहीं भी, किसी भी डिवाइस पर और अंत में लोग 4 थे किसी भी भाषा के लिए काम कर रहे हैं

तकनीकी मध्यस्थता जानकारी
यह अनुमान लगाया गया है कि 1 9 86 में सबसे अच्छी जानकारी रखने वाली दुनिया की तकनीकी क्षमता 2.6 (बेहतर संकुचित) एक्साबाइट से बढ़ी - जो प्रति व्यक्ति (प्रति व्यक्ति 539 एमबी) से कम एक 730 एमबी सीडी-रॉम के लिए सूचनात्मक है - 295 तक (बेहतर ढंग से संकुचित) 2007 में एक्सबाइट्स। यह 2007 में लगभग 61 सीडी-रॉम प्रति व्यक्ति के बराबर है।
एक तरफ़ा प्रसारण नेटवर्क के माध्यम से जानकारी प्राप्त करने के लिए दुनिया की संयुक्त तकनीकी क्षमता यह थी कि 2007 में प्रति दिन प्रति व्यक्ति 174 समाचार पत्रों के बराबर था।
दो-तरफा दूरसंचार नेटवर्क के माध्यम से सूचना का आदान-प्रदान करने की दुनिया की संयुक्त प्रभावी क्षमता 2007 में प्रति व्यक्ति प्रति दिन 6 समाचार पत्रों के बराबर थी।

2007 तक, सभी नई सूचनाओं का अनुमानित 90% डिजिटल है, जो कि हार्ड ड्राइव पर संग्रहीत है

Tuesday, June 27, 2017

दोन वेळेसाठी लढनार्यांचा धर्म तो कोणता

 अन्न, वस्त्र , निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत आणि धर्म, अर्थ, काम हे माणसाने माणसासाठी एका विशिष्ट हेतू साठी निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत त्यात मुलभूत हेतू आहे तो म्हणजे माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे , तसेच तो समाजशील सुद्धा आहे , म्हणजे तो एक तर पंचज्ञानेन्द्रियाने जे साठवतो ते तो परत वापरू शकतो आणि त्याला कळपात राहायची सवय आहे म्हणून तो इतर जंगली पशु तसेच निर्विकार पाळीव पशु या पेक्षा वेगळा आहे याची नेहमी जाणीव राहावी यासाठी प्रत्येक वेळी काल ,वेळ, स्थळ, इत्यादी  यांचा  विचार करून संहिता बनविल्या गेल्या त्यात व्यवस्था कशी चालवली जावी कोण कशा प्रकारे कोणत्या प्रसंगी पुढाकार आणि माघार घ्यावी (कारणासहित)  आणि त्या व्यवस्थेत धर्म , अर्थ , काम यांची सांगड घातली गेली. 

सुखस्य मूलं धर्मः , धर्मस्य मूलं अर्थः |
अर्थस्य मूलं राज्यं , राज्यस्य मूलं इन्द्रिय जयः ||
इन्द्रियाजयस्य मूलं विनयः, विनयस्य मूलं वृद्धोपसेवः |||
वृद्धोपसेवाय विग्न्यानं , विग्न्यानेनं आत्मानं सम्पद्येत
समपदितात्म जितात्मम भवति, जितात्मा सर्वार्थे संयुज्यते ||||

सुख का मूल धर्म है. धर्म का मूल अर्थ है. अर्थ का मूल राज्य है. राज्य का मूल इंद्रिय विजय है.
आणि इंद्रिय विजय म्हणजे काम विजय (काम या शब्दाचा अर्थ पंच्ज्ञानेद्रियांची हौस कारण जी भागवली जात नाही ती हौस असते ) त्याच मूळ विनय ,वृद्धांची सेवा,विज्ञान ज्याने आत्मा जितात्मा होऊन पावन होतो 
आता सुख नावाच्या गोष्टी साठी काय काय लागते हे वर दिले आहे 
पण सुख म्हणजे नेमके काय असते हे कळण्यासाठी अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. जर त्यासाठीच एखाद्याची सर्व उर्जा खर्च होत असेल तर तो वरील कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसावा.
नव्हे त्याला किंचितही फरक पडत नसावा आणि व्यवस्थाही त्याचा विचार करीत नाही असा त्याचा वैक्तिक समाज असेल. कारण व्यवस्था फक्त दोन स्थान देते भाग अथवा शिकार जे माणसे व्यवस्थेचा भाग असतात ते जून आहे ते चालू राहावे या साठी आग्रही असतात आणि जे लोक शिकार असतात ते या लोकांकडून सहानुभूती प्राप्त करत असतात कारण मूळ हे तटस्थ असले तरी नवीन काही तरी अनुकरणीय असले कि मनुष्य प्राणी मागे पुढे जास्त बघत नाही .

पण एक गोष्ट  मात्र  खरी आहे व्यवस्था आली कि मक्तेदारी नावाचा प्रकार दिसून येतोच . आजच्या काळात न्याय,संरक्षण,शासन,अर्थ,माध्यम,ह्या नवीन व्यवस्था आहेत आणि त्यातही जाणीवपूर्वक मक्तेदारीला आमंत्रण दिले जाते, आणि या कोणत्याही व्यवस्थेत नसणारे ते आहेत आमचे तटस्थ, दोन वेळेसाठी लढणारे , फक्त विचारंनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच करावे लागतात हे ठासुन सांगणारे !
त्यांना हे व्यवस्थेतील मक्तेदार कधी आपुलकी दाखवतात अन व्यवस्थेत घेतात तर कधी तुच्छ वागणूक देऊन शिकार बनवतात अन मग चक्र पुन्हा चालू राहते जो व्यवस्थेत गेला तो व्यवस्थेचे गोडवे गोता अन  जो शिकार झाला तो व्यवस्थेला शह देण्याची वात पेटवून व्यवस्थेपर्यंत ती आग पोचण्याची वाट  बघतो.
यात कितीही विचार केला तरी आपण या तटस्थ लोकांचा सुखामागचा मूळ हेतू धर्म नाही सांगू शकत 
जे काही औपचारिक धर्म या नावाने चालणारे गडे आहे त्या संहिता माणसाने बनवल्या यात कुठेही दुमत नसावे त्यामागे दोन मूळ कारणे १) जुना अनुभव 2) वर्तमान परिस्थिती या दोन गोष्टी संहिता लिहितांना हाताळल्या जातात अन नेहमी  शिकार झालेले लोकच त्यावर विश्लेषण करून बदलाची मागणी करतात हे प्रत्येक संहितेचे विशेष म्हणावे लागेल कारण प्रत्येक संहितेने भविष्यासाठी काही नसेल केले पण हे व्यवस्थेचे शिकार त्या मूळ हेतूचे कार्य साध्य करतात म्हणजे माणसाच्या मूळ स्वभावातच ते रुजलेले आहे असे म्हणावे लागेल 
बाकी शेवटच्या ओळी तथाकथित बुद्धीजीवी अन अनुयायी लोकांसाठी 



" कभी मनुने  लिखी थी संहिता कभी भीमराव ने लिखा था संविधान पार आज भी सरकारी व्यवस्था मी चार हि स्तर (क्लास) है और बिगरसरकारी (अतिशूद्र ) तो गिनती मे भी नाही आते   तो बताओ कोनसी व्यवस्था बदली कोनसा समाज बदला न व्य्वस्था बदली न बदला समाज बदला तो बस व्यवस्था मी तुमारा स्थान !!!"


शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

Sunday, June 18, 2017

व्यवस्था : एक श्रेणी बद्ध रचना

व्यवस्था ही एक श्रेणीबद्ध रचना आहे आणि त्यातील श्रेणी आणि श्रेणीचे स्थान खालील पद्धतीने ठरवले जाते

१) प्रमाण : वेळ ,पैसा, श्रम, ज्ञान याच्या प्रमानावरून श्रेणीतील स्थान ठरते

2) समावेशाचा काल: जो जितक्या अगोदर श्रेणीमध्ये समाविष्ट झाला तो तितक्या लवकर श्रेणीचे स्थान पक्के करत जातो.त्यात वर दिलेले मुद्दे ठरावास कारणीभूत ठरतात

३) वंश , वडिलोपार्जित कर्म : वाडवडिलांनी ज्या श्रेणीत काम केले त्या श्रेणीत वंशज काम करत राहील असा एक प्राथमिक समज आहे तरी एखादा वंशज पाहिजे तेव्हा आप्तांचा रोष पत्करून तसेच सहानुभूती आणि दरारा यांच्या जोरावर श्रेणी व स्थान बदलू शकतो

४)महत्त्वकान्क्षा : जर सर्व व्यवस्था एके ठिकाणी काही परिस्थितीमुळे एका माणसाकडे आकर्षित होत असेल तर त्या माणसाची मह्त्वकान्क्षा ठरवते कि तो अन त्याची श्रेणी कोठवर जाऊ शकते

५) पर्यायी श्रेणी : पर्यायी श्रेणी तयार झाल्यास बहुतेक लोक त्या श्रेणीमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतील आणि जुन्या श्रेणी नष्ट करण्याचा प्रयत्न करतील पण उरलेले लोक जुन्या श्रेन्यांना चिटकून राहतील.

६)व्यवस्था डळमळीत होणे किंवा अतिप्रासंगिक होणे   : हा रचनेचा शेवटचा पण निर्णायक भाग जेव्हा व्यवस्थेतील सर्व लोक एकमेकांवर अवलंबून आहेत याची जाणीव सर्वांना झालेली असेल तसेच प्रसंगानुसार कोणीही कधीही श्रेणी आणि स्थान बदलत राहील आणि काही तथाकथित विचारवंत व्यवस्था बनवानार्याला कशी अक्कल नव्हती हे सिद्ध करायला जीव खर्ची घालतील आणि सर्व श्रेन्यांतून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळतील



पण एक गोष्ट मात्र कोनिहि विसरता कामा नये

" व्यवस्था न बदली हे, न बदलेगी ,बदलेगा तो बस  व्यवस्था मे तुम्हारा स्थान "!!!


Sunday, April 30, 2017

सहानुभूती किंवा दहशत :रहस्यांचा समुद्र शिवा Sympathy or Terror :Shiva the Ocean of Secrets

पुराणांत शिवाचे दोन रूप दाखवले जातात एकाला नाव भोला सांब किंवा शंभो आणि दुसर्याला नाव आहे रुद्र किंवा भैरव

जेव्हा मनुने संहिता बनवली, तेव्हा शिवा भोला सांब होता त्याने सुरुवातीला तिच्याशी जुळवून घ्यायचे ठरवले कारण तो एक कृषक होता ,निर्माण कर्ता होता म्हणून त्याला सहानुभूतीची गरज होती म्हणून त्याने हि व्यवस्था स्वीकारली. म्हणजे, शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती -जुळवून घेणे. हा प्रकृतीचा नियम आहे म्हणजे उत्पादक कृषक जो आहे त्याला सहानुभूतीची सगळ्यात जास्त गरज आहे . कारण तो निर्माण कार्य करत असतो आणि त्याचे परिणाम सर्वांच्या जीवनावर होतो तोही चांगला .
आता शिवाच्या दुसर्या रुपाकडे लक्ष देऊ शिवाने जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला ,पण व्यवस्था जेव्हा सहानुभूती देते तेव्हा त्याला अनेक समस्या निर्माण करते,हे त्याच्या लक्षात आले मग त्याचेच रुपांतर झाले ते समोरे जाण्याला म्हणजे व्यवस्थेत ज्या काही समस्या त्याला दिसू लागल्या ,त्याला त्याने सामोरे जायचे ठरवले आणि स्वतःची दहशत निर्माण केली तिचे कारण ज्या समस्या त्याला समोर येतील त्याचा नाश करन्यासाठी म्हणजे शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने
पर्यायाने आपण म्हणू शकता कि शिवा जेव्हा सांब रुपात होता त्याला सहानुभूती मिळाली ,पण त्याची हार त्यातच आली आणि शिव जेव्हा रुद्र रुपात आला तेव्हा त्याच्या दहशतीने त्याला जीत मिळवून दिली
यातून हे लक्षात येते कि
 शिवा(सांब शंभो )-निर्माण-सहानुभूती-जुळवून घेणे-हार(व्यवस्थेचा भाग)
शिवा (रुद्र भैरव )-नाश -दहशत -सामोरे जाने-जीत(व्यवस्थेचा शिकार )
ज्या माणसाला काही नवीन निर्माण करण्याची इच्छा आहे त्याने सर्वांची सहनिभूती प्राप्त करणे योग्य आहे आणि तो माणूस व्यवस्थेचा भाग असला  पाहजे
जो माणूस व्यवस्थेचा शिकार झाला आहे तो स्वतःची दहशत निर्माण करून व्यवस्था नष्ट करण्या साठी कार्यरत असतो



There are two forms of Shiva in the Purana, one is named Bhola Samb or Shambho and the other is Rudra or Bhairav.

When Manu made a code, Shiva Bhola was a Sambha, he initially decided to adapt to that because he was a farmer, so he needed sympathy, so he adopted this arrangement, that is Shiva (Samb Shamba) - Creation-Sympathy-Follw. That is, the productive farmer who is most needed for sympathy. Because it is working on the construction and its effects are on everyone's life, even better
 Now Shiva tried to adapt to another form of Shiva, but when the system gave sympathy, he realized that it would create many problems. Once he got converted, he decided to face any problems that he had seen in the system and his own panic The problem that caused him will cause him to come to the front To destroy him, Shiva (Rudra Bhairav) -Destruction-Terror-Face
Alternatively, you can say that Shiva was sympathetic when he was Sambhu, but his defeat came in and Shiva gave him victory when he came in Rudra
From this it realizes that
 Shiva (Samb Shamba) - Creation - Sympathy-Follow-Defeat (Part of the system)
Shiva (Rudra Bhairav) -Destruction -Terror-Face-Victory (system hunting)
The person who wants to create something new is the right person to be able to take care of everyone and it is a part of the system.
The person who is hunted by the system is working to create panic by destroying the system


THIS IS BINARY PHILOSOPHY
EITHER FACE OR FOLLOW
EITHER GET SYMPATHY OR TAKE THE HELP OF TERROR
EITHER CREATE SOMETHING OR DESTROY WHICH ISN'T NEEDED
THEN YOU WILL GET VICTORY OR DEFEAT
BE A SHAMBHO OR RUDRA


शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड 
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   


Saturday, February 11, 2017

आधुनिक वनवास (स्थलांतर, वसाहत इत्यादी)

हा लेख त्यांना उत्तर असेल जे विचारतात कि सर्व देव भारतातच का झाले बाकी देशात नाही आजच्या परिस्थितीत सांगायचे तर आजही अफगाणिस्थान आणि इंडोनेशिया बेटे या ठिकाणी तसेच थाइलंड सारख्या देशात रामाचा इतिहास जपला जातो. तसेच इथे अजून वर्णन करू इच्छितो कि महाभारतपेक्षा जटील राजकारण हे रामायणात आहे कारण आज जसे सुशिक्षित बेरोजगार किंवा महत्त्वकान्क्षी तरुण परगावी जाण्यास प्रवृत्त होतात तसेच जुन्या काळी क्षत्रिय एक तर जन्मभूमीवर राज्य करत किंवा वनवासाला जाण्यास भाग पाडले जात. आता ज्यांना इतिहासाला पुरान बनवून माणसाला देव बनवायचे आहे त्यांच्या दृष्टीने हे भयानक असेल पण राजा रामाने वनवासात असतांना त्याचा त्याचा मुलभूत गुणधर्म नाही सोडला क्षत्रियांचा धर्म असतो नगरांची उभारणी करणे यात रामाला नेहमीच यश आले तरी युद्ध हेसुद्धा क्षत्रियांच्या धर्मात असतेच तिकडे दहा भावनांनी पूर्ण असलेला ब्राम्हण राजा दशानन रावनाच्या राज्यात जनता सुखी नव्हती असे नाही पण इथेच धर्म संपून राजकारण सुरु होते आणि जे देव दानव सुरासुर चातुर्वण्य प्रमाण मानतात त्यांना धक्का बसतो कारण मी याअगोदरही लिहिले आहे . रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते हे मोठे होते आहे आणि राहील आणि सुग्रीव बिभीषण यांच्या महत्त्वकान्क्षा पूर्ण करण्यासाठी रामाने मित्र या नात्याने जे करता येईल ते केले यात समदु:खी असणे हे मुलभूत कारण होते एक म्हणजे सुग्रीव आणि रामाचे दुख(पत्नीचा विरह ) आणि दुसरे बिभीषण आणि सुग्रीवाच दुख (भावाची गादी आणि जन्मभर चाकरी तरी हाती काही नाही). 
आजही त्याच मार्गाने जात आहात तरी लक्षात ठेवा राज्य कोणतेही असले तरी राजधान्या तुमच्या  असल्या पाहिजेत आणि राजधानीचे सार्वभौमत्व तसेच तेथील विविधता टिकून ठेवणे हे आपले काम आहे. कारण विविधता असेल तरच आदान प्रदान होईल आणि ते करणारे व्यापारी (वैश्य ) जगतील आणि तुमची सुरुवात कशीही असो तुम्ही नगरे वसवण्यात सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. सर्व विषमता जाणून त्यात खितपत पडण्यापेक्षा सर्व विषमता जाणून तुमची सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण सर्व एकमेकांवर अवलंबून अहोत हे जाणून प्रत्येक उपलब्ध गोष्टीचा उपयोग करायला शिका .
कारण युद्धजन्य परिस्थितीत संसाधने हे विकेंद्रित होतात जे कि एकाच वर्गाची मक्तेदारी म्हणून बघितले जातात आणि प्रत्येक संसाधनाचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने वापर केला तरच नगर भरभराटीस येतात.

आता नेमके काय करायचे ? 
याचे उत्तर देतांना आपल्याकडे दोन मार्ग आहेत 
एकतर आज जिथे आहात तिथे नागरी वसाहत स्वयंपूर्ण करा म्हणजे बाहेरून येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रदेशात असतील तर त्याचे उत्पादन सर्वांना पुरेल एवढे होईपर्यंतची व्यवस्था निर्माण करा 
नाही तर मग असे एक ठिकाण निवडा जिथे सर्व आहे आणि तिथे जाऊन वसाहती निर्माण करा. 

असे सांगितले जाते कि पृथ्वीवर एवढे आहे ज्याने सगळ्यांची "गरज "भागेल ,पण एवढेही नाही कि एखाद्याची "हौस" भागेल . 
म्हणून जमिनीवरील संसाधनांचे चक्र हे वार्षिक किंवा पंचवार्षिक दशवार्षिक आहे  जे कि आपल्या जीवनास पूरक तसेच पुढच्या पिढ्यांना माहिती देण्यास साजेसे आहे  जमिनीखालील संसाधनाचे चक्र आपल्या जीवनचक्राच्या कितीतरी पटीने मंद आहे आणि जमिनीखाली असलेल्या संसाध्नासाठी लागणारे पदार्थ कसे जाऊन मिळतात हे आपल्याला माहित नाही याउलट जमिनीवरील सर्व संसाधनाची सर्व प्रक्रिया आपण करत असल्याने ती सोयीस्कर रित्या आपण पुनर्निर्मित करू शकतो .
या गोष्टी सर्वांना  लहान पणापासून कळल्या पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करा. 
आणि हो तुमची शरीररचना हि तुम्हाला लाभलेल्या जल,वायू , अधिवास यांवर अवलंबून आहे म्हणून कोणी जर तुमच्या रचनेवरून तुमची तुलना करत असेल तर तुमच्या रचनेचे सर्व  बारकावे समजून सांगता येईल एवढे ज्ञान तरी तुमच्यात असावेच (यात अन्न वस्त्र आणि निवारा याचे ज्ञानाचा समावेश होतो). म्हणून कोणत्याही न्यूनगंडापायी अपप्रचाराला बळी पडून संपत्ती नष्ट करू नका.

आणि शेवटचे स्पष्ट बोलतो माफ करा "पण माझ्या मते कोणत्याही धर्माच्या पंथाच्या जातीच्या संप्रदायाच्या 'पुजार्यांना'  जर ते ज्याच्या बळावर उपदेश करतात त्या ग्रंथांचे  ज्ञान नसेल आणि त्या ग्रंथाचे ज्ञान असूनही ते देण्याची आसक्ती नसेल आणि शेवटी ग्रंथातील ज्ञानाला वैचारिक पातळीवर आजच्या काळानुसार काय बदल करायचा ते जमत नसेल तर ते माझ्या दृष्टीने देवाचे व्यापारी आहेत आणि काही नाही "
तसेच आजच्या काळात अनेक कारणांसाठी धर्मबदल करतांना प्रथम जिथे आहात ते ग्रंथ सविस्तर वाचा जिथे जाणार आहात ते सविस्तर वाचा आणि जो ग्रंथ आजच्या घडीला तुम्हाला न्याय देत असेल तो निवडा कारण एकदा तुमच्यात झालेले बदल तुमच्या पुढच्या पिढीने बघितले तर त्यांनाही जाणीव राहते कि जसे बदल आपल्यागोदर काही ठराविक कारणांसाठी झाले ते पुढे बदलावे किंवा न बदलावे .



शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

Saturday, January 28, 2017

चित्रपट विविधता आणि गुणधर्म

आजच्या जगात चित्रपट हे मध्यम आणि मनोरंजन् व्यवसायाचे एक प्रभावी शस्त्र आहे. तरीही जगात प्रत्येक ठिकाणच्या चित्रपटांविषयी तुलनात्मक माहिती आपण प्रामुख्याने सांगू शकतो उदा. चीनच्या कोणत्याही चित्रपटात कुंग फु असतेच . कितीही प्रयत्न केला तरी बॉलीवूड च्या चित्रपटातून आपण प्रेम नावाचा प्रकार आपल्याला काही अंशी का होईना दाखवलेलाच दिसतो. तर प्राथमिक मुद्दा असा कि हॉलीवूड चे चित्रपट ह्यांचा मुल गुणधर्म आहे निर्माण (प्रत्येक चित्रपटात निर्माण किंवा मानवनिर्मित गोष्टींना ज्या आज अस्तित्वात आहेत ) ते प्रत्येक गोष्टीत दाखवून देतात कि मानव काय निर्माण करू शकतो त्याने काय काय निर्माण केले त्याची बुद्धी कशी चालते इत्यादी . तर भारतीय चित्रपटात भावना महत्वाची तत्व महत्वाचे (इतिहासातही  डोकावून बघणारे सर्व चित्रपट हे नाही दाखवत कि काय काय निर्माण झाले  ) जरी कितीही चित्रपटात  निर्माण दाखवले तरी माणसाची ओळख , मुत्सद्देगिरी ,तत्व ,ह्या गोष्टी त्या निर्माणावर मात करून जातेच. आणि सहसा माणसामाणसांतील वाद , वैमनस्य , त्याची कारणे हे अत्यंत चांगल्या रीतिने येथे दाखवले जाते.   
   म्हणूनच कि काय येथील मनामनात त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीपुजक देशात, जास्त अधिकार असलेल्या माणसाला (गटप्रमुख)येथे गटाचे मालक समजले जाते, मुळात तोही गटाचा (team) एक हिस्सा असतो हे कुणी मानतच नाही . तर हॉलीवूड मध्ये जरी गटप्रमुख दाखवला गेला तरी त्याच्या तोडीचे अनेक माणसे आपल्याला विवध ठिकाणी काम करतांना दिसतात .
संस्कृतीचे दर्शन आपल्याला याच चित्रपटांद्वारे घडते उदा.फ़क़्त परिणाम हा होतो कि निर्माण गाभा असलेल्या हॉलीवूड मध्ये रीतसर एखाद्या निर्माणाच श्रेय दुसरे कसे घेतात तसेच जे निर्माण करूनही जर त्याचे श्रेय न भेटल्याने वाईट मार्ग स्वीकारतात आणि वाईट ठरवले जातात हे ठसवले गेले असल्याने प्रत्येक जण श्रेय घेण्यासाठी धडपड करत असतो. 
आणि बॉलीवूड मध्ये अथवा सर्व भारतीय चित्रपट असे दाखवून देतात कि काही महत्वाकांक्षी लोकांमुळे जरी एखाद्या माणसाची प्रतिमा मलीन केली गेली तरी येथील माणसे प्रत्येकाच्या भूमिकेला न्याय देण्याच्या मार्गाने विचार करतात आणि त्यांना कळत कि यात मुळ श्रेय कोणाच असेल म्हणूनच कि काय आज श्रेय कोणीही घेतले तरी काही फरक पडत नाहि तसेच  आज जगाला तोडणारे कितीही मुद्दे असले तरी ते आपण खोडून काढून किंवा ते न करताही जगू शकतो.
तरीही याचा उलट वापर होतो हे हि धरून चालावेच लागते आणि असा वापर बुद्धीजीवी लोकच करतात आणि ते लोकं हे हि विसरून जातात कि आपल्याला भेटलेल्या प्रसिद्धीचा कोणाची निंदा करण्यासाठी वापर करणे आपल्या प्रसिद्धी साठी धोकादायक तर आहेच तसेच तुमची निंदा करणारेही तयार होतात याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल 
आपले मत मांडण्याचे माध्यम म्हणून जरी बुद्धीजीवी याकडे बघत असले तरी इतिहास बदलण्याचे साधन म्हणून याकडे बघू नये(भले ते श्रेय हस्तांतरण असेल किंवा बदनामी असेल ) हि माझी अपेक्षा !!!

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम    

Saturday, January 30, 2016

सुभाषित :- संस्कृत संस्कृतीची देण

सुभाषित - ही एक चारोळी ,अभंग , यांसारखीच एक रचना आहे
यामध्ये दोन किंवा चार ओळींमध्येच खुप मोठा अर्थ सामावलेला असतो .
आम्ही जेव्हा ८ व्या ईयत्तेत पहिल्यांदा ही रचना
बघितली तेव्हा त्यातील आमच्या पसंतीच्या म्हणा
किंवा आमच्या जीवानाशी निगडीत म्हणा ह्या काही  पुढील रचना

१:-गरीबीचा आशीर्वाद -Blessed are the poor!

bho dAridryaM namastubhyaM siddho&haM tatprasAdAtaH |
pashyAmyahaM jagat sarvaM na mAM pashyati kashchana ||

भो दारिद्र्यं नमस्तुभ्यं सिद्धोऽहं तत्प्रसादातः ।
पश्याम्यहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ॥

O poverty, homage to you; by your grace I have obtained magical powers:
I see the whole world, and nobody sees me!

"अरे दारिद्र्या तूला नमस्कार असो , तुझ्या ऊपकाराने मी सिद्ध झालो आहे की मी सर्व जगाला बघु शकतो , समजु शकतो पण मला कोणी बघत नाही किंवा कोणालाही माझ्याकडे बघावे असे वाटत नाही "

कोणत्याही गरीब शेतकऱ्यानेच याची रचना केली असावी कारण आजही सर्वात जास्त गरीब हे आपले अन्नदाते ऊत्पादक शेतकरीच आहेत

********************
२:- कपड्यावरुन ओळख
• Here is a subhAShita --wisdom words, that speaks about the samudra manthana--churning the ocean of milk, and says humorously that ultimately it was the dress that made the difference for the gods ViShNu and Shiva!

किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वासः प्रधानं खलु योग्यतायै ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥

kiM vAsasA ityatra vichAraNIyaM
vAsaH pradhAnaM khalu yogyatAyai |
pItAmbaraM vIkShya dadau svakanyAM
digambaraM vIkShya viShaM samudraH ||

"What's in one's dress"—-is a point for contemplation;
apparel is indeed important for appropriateness;
Looking at the one dressed in bright yellow clothes (MahAviShNu), the ocean gave him his daughter;
seeing the one dressed in nothing (Shiva) it gave him poison!

कोण म्हणेल वस्ञ माणसाची ओळख बनवत नाहीत वस्ञांनीच माणुस समजला जातो म्हणुनच
चमकदार  पितांबर नेसलेल्या विष्णुला सागराने कन्या दिली तर दिगंबर शिवाला त्याच सागराने विष दिले
********************
३:- प्रसिद्धीसाठी कायकाय
• This one is about the persistent itch of becoming famous in us.

ghaTaM bhindyAt paTaM ChindyAt kuryAt rAsabharohaNaM |
yena kena prakareNa prasiddhaH puruSho bhavet ||

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणं ।
येन केन प्रकरेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥

Breaking a pot, tearing a cloth, or riding on a donkey--
doing something by hook or crook, (everyone) tries to be famous!

घडा फोडणे , कपडे फाडणे , किंवा गाढवाची सवारी करणे असे प्रत्येकजण करत असतो कारण प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो

(Reminded of the Guinness Book of World Records?)

********************
४:-भारतमातेला वंदन -

रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिररत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥

To her whose feet are washed by the ocean, who wears the Himalayas as her crown, and is adorned with the gems of rishis and kings, to Mother India, do I bow down in respect.

--viShNu purANam

जिच्या चरणांना सागर धुतो आणि हिमालय जिचा मुकूट आहे ,जेथे अनेक राजे आणि ऋषीरुपी  रत्न आहेत त्या भारतमातेला नमस्कार

*****************
५:- जागेवरच किंमत

स्थान भ्रष्टा  न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः
Sthan Bhrashtaa Na Shobhenta Dantah Keshah Nakhah Naraah

i.e. Teeth, hairs,finger nails and persons lose their importance and are neglected once they are dislodged from their position (Sthaan Bhrashta). All the aforesaid four are cared and pampered so long they occupy their position.
जर दात,केस,नखे,आणि माणूस जागेवर नसतील तर त्यांची किंमत केली जात नाही (ते शोभुन दिसत नाहीत )

Wednesday, December 30, 2015

कथा २२ १/२ गावांची

तोमर/तोवर/तंवर/तौर
एक क्षत्रिय राजघराणा
- - - - - - - - - - - - -
तौर-जहागीरदार,
तौर-ठाकूर
(ठाकूर म्हणजे राजा)
@
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आणि तेही गोदावरी नदीच्या सुपीक पट्ट्यात तौर-ठाकूर या अभिमानी आडनावाने राहाणाऱ्या लोकांची काही गावे आहेत. जी की तौर-ठाकुर यांच्या जहागीरीतील गावे आहेत. तौर-ठाकूर यांच्या जहागीरीतील गावांची संख्या सुद्धा थोडी लॉजिकल अशीच आहे. ती म्हणजे ही जहागीरदारीतील गावे आहेत साडेबावीस.!
तौर-ठाकुर यांची तब्बल साडेबावीस गावची जहागीरदारी असली, तरी अगदी जहागीरदार असल्याच्या वा ठाकूर म्हणजे राजा, राज घराण्यातील असल्याचा कसलाच अविर्भाव अथवा अभिमान न दाखवता राहाणारे लोक म्हणून तौर घराण्याची ओळख आहे. या साडेबावीस जहागीरीतील गावांखेरीज तौरांची उस्मानाबाद जिल्ह्य़ात सुद्धा काही गावे आढळतात. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यात तौर यांची 'देशमुख' आडनाव लाऊन अभिमानाने वावरणारी अजून वेगळी चार गावे (गावांची संख्या जास्त असू शकते) सुद्धा पाहायला मिळतात.
अलिकडे इतिहासातील अनेक नवनवीन अभ्यासक आहेत, की ज्यांचा राजपुतांमधून मराठ्यांची उत्पत्ती झाली असावी, या गोष्टीला विरोध आहे. मात्र मराठवाडय़ातील तौर घराण्यावर अभ्यास केल्यास वरील अभ्यासकांचा विरोध मावळेल. कारण तौर घराण्याचा पूर्वज इतिहास हा उत्तरेतील तोमर/तोवर/तंवर राजपुतान्यातील कुळातील इतिहासाशी जुळलेला आहे. वरील सिद्धांताने अभ्यास न केल्यास तौर घराण्यावर अभ्यास करणे शक्य होणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तौर आणि सोळंके या दोन्ही घराण्यातील लोकांना त्यांचा पूर्वीचा इतिहास विचारल्यास या लोकांचे महाराष्ट्रात येण्याचे कारण हे देवगिरीची लढाई असेच सांगितले जाते. अल्लाउद्दीन खिलजी याचे देवगिरी राज्यावर आक्रमण झाल्याने, देवगिरीच्या राजाने मदतीसाठी राजस्थान राज्यातील (आताचे गुजरात) सोलंकी राजांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार गुजरातेतून सोलंकी आणि तंवर राजांच्या फौजा देवगिरीच्या मदतीसाठी निघाल्या होत्या. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा देवगिरी येथे पोहोचण्या पूर्वीच राजा रामदेवराय यादव आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात तह झाला.
या तहाने यादव राजाला क्षणार्धात मंडलिक राजा बनविले. तलवारीच्या पात्याला रक्ताचा एक थेंबही न लागता रामदेवराय कडून सर्व काही मिळालेल्या अल्लाउद्दीन खिलजीचे धाडस अजूनच वाढले आणि त्याने रस्त्यावर चालणाऱ्या सोलंकी आणि तंवर फौजांवर आक्रमण केले. या दोन्ही फौजांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन त्यात सोलंकी आणि तंवर फौजांचा पाडाव झाला. खिलजीने क्षणाचाही विलंब न करता सोळंकीच्या राजधानीच्या पाटन शहराकडे सैन्य दामटवले आणि पाटन शहरावर चढाई करून ते ताब्यात घेतले.
खिखिलजीच्या अशा या दुहेरी आक्रमणाने सोलंकी आणि तंवर यांच्या फौजा बेघर झाल्या. बेघर झालेल्या तंवर लोकांनी मराठवाडय़ातील दंडकारण्याचा भाग असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर आपले बस्तान बसवले. तर सोलंकीच्या बेघर झालेल्या लोकांनी सह्याद्री पर्वतरांगेत आपली छावणी टाकली आणि पुढे या छावणीला सोळंकीची राजस्थान राज्यातील राजधानी असलेल्या पाटनची आठवण म्हणून पाटन हे नाव दिले.
सख्या आणि चुलत अशा तेवीस भावंडांचे बळ असलेल्या तंवर यांनी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आपली तेवीस गावे बसवली. या गावात बावीस पूर्ण आणि एका अर्ध्या गावाचा समावेश असल्याने तंवरांची साडेबावीस गावे असल्याचे सांगण्यात येऊ लागले.
तंवरांच्या साडेबावीस गावातील सर्वात थोरले गाव म्हणून उक्कडगाव हे गाव असल्याने, तंवरांची साडेबावीस गावे मोजताना सर्वात अगोदर उक्कडगाव येथून मोजदाद करावी लागते. आणि ही मोजणी थोरल्या भावापासून धाकट्या भावाकडे (गाव) मोजत नेण्याची पद्धत आहे.
"तौर-जहागीरदार
यांची साडेबावीस
गावांची यादी"...
1) उक्कडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
2) गोपत पिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड.
3) ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड.
4) शेवनगाव, ता. घनसावंगी, जि. जालना.
5) कवडगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
6) शेलगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
7) रिधोरी, ता. माजलगाव, जि. बीड.
8) भादली, ता. घनसावंगी, जि. जालना.
9) गुंज, ता. घनसावंगी, जि. जालना.
10) लिंबी, ता. घनसावंगी, जि. जालना.
11) डुब्बा, ता. माजलगाव, जि. बीड.
12) काळेगाव, ता. माजलगाव, जि. बीड.
13) चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
14) सावरगाव, ता. परतूर, जि. जालना.
15) संकनपुरी, ता. परतूर, जि. जालना.
16) वारुळा, ता. माजलगाव, जि. बीड.
17) गोळेगाव पोकतपुरी, ता. परतूर, जि. जालना.
18) हिवरा, ता. माजलगाव, जि. बीड.
19) ठाकर आडगाव, ता. गेवराई, जि. बीड.
20) वडवणी, ता. वडवणी, जि. बीड.
21) बाबुलतारा (तौर बोंगे), ता. गेवराई, जि. बीड.
22) हिशी धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी.
आणि अर्धे गाव
23) टाकरवन, ता. माजलगाव, जि. बीड.
तौर-ठाकूर जहागीरदार यांची वरील जहागीरदारीतील साडेबावीस गावे आहेत. तौर हा हजारो वर्षाचा राज घराणा आहे. तौर म्हणजे ठाकूर (राजे) आहेत. शिवाय त्यांना साडेबावीस गावची जहागीरदारी असल्याने तौर हा घराणा जहागीरदार आहे. गावात आपल्यापेक्षा कोणी मोठा नसावा म्हणून या घराण्यातील लोकांनी गावपातळीवरील पाटीलकी घेतलेल्या आहेत. तौर- ठाकूर- जहागीरदार अशा घराण्यातील मोठाल्या उपाध्या आडनावा समोर लावायच्या सोडून हे लोक तौर आडनावा समोर "पाटील" ही (सर्व उपाध्यातील खालची पदवी.!) गावपातळीवरील पदवी लावून मिरवताना दिसत आहेत.
तौर घराण्याचा इतिहास
- - - - - - - - -
तोमर/तोवर/तंवर/तौर हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक प्रमुख राजपूत राजवंश आहे. तोमर क्षत्रिय हे छत्तीस कुळी क्षत्रियातील चन्द्रवंशी कूळ असून या कुळाला पाण्डु पुत्र अर्जुनाचे वंशज मानले जाते. यांचे गोत्र अत्री आहे.
तोमर/तंवर हा वंश उत्तर मध्य काळातील खूप ताकतवर वंश मानला जातो. उत्तर पश्चिमी भारतातील मोठ्या भागात या कुळाचे राज्य होते. तोमर/तंवर/तौर यांच्या राज्याची राजधानी ढिल्लिका (आजची दिल्ली) ही होती. तंवर राज्यनिर्मितीचे श्रेय हे याचं वंशातील तोमर राजांना दिले जाते.
राजपूत वंशामध्ये तोमर/तोवर/तंवर या वंशाचे एक श्रेष्ठ असे स्थान आहे. भारतीय पौराणिक कथेतून असे लक्षात येते की, सुरुवातीच्या काळात तोमर लोकांचे निवासस्थान हे हिमालयातील आसपासच्या परिसरात होते. मात्र दहाव्या शतकात हे लोक करनाल पर्यंत विखुरले आढळून आले आहेत. ठाणेश्वर या भागात सुद्धा यांचे राज्य विखुरलेले होते.
त्या वेळी उत्तर भारतातील कान्यकुब्ज भागात प्रतिहार राजपूत वंशातील राजांचे साम्राज्य विस्तारलेले होते. परिहार साम्राज्यातील मांडलिक राजे म्हणूनच तंवर राजांनी दक्षिणेत स्थलांतरित होण्यास सुरुवात केली.
ढिल्लिका (दिल्ली) मध्ये तंवर यांचा शासनकाल कोणत्या काळातील असावा हे अनिश्चित असले तरी विक्रम संवत दहाव्या आणि अकराव्या शतकात आपल्याला सांभरचे चौव्हाण आणि तोमर यांच्यातील युद्धाचे उल्लेख सापडतात. तोमर नरेश रुद्र हा चौहाण राजा चंदन याच्या हातून मारला गेला होता. तसेच तंत्रपाल तोमर हा चौहान राजा वाक्पति याच्याकडून पराभूत झाला होता. वाक्पति चौहान राजाचा मुलगा सिंहराज चौहान याने तोमर नरेश सलवण याचा खून केला होता.
मात्र चौहान राजा सिंहराज सुद्धा काही दिवसांनी मारला गेला. सिंहराज चौहान हा तोमर यांच्या हातूनच मारला गेला असावा असे लक्षात येते. यावरून असे दिसते की तोमर राजे हे त्या काळी दिल्लीचे राजे बनले होते.
मोहम्मद गझनीच्या सर्वात सुरुवातीच्या आक्रमणावेळी दिल्ली-थानेश्वर येथील तोमर राजवंश हा उत्तर-पश्चिमी भारतातील एक शक्तीशाली राज घराणा समजला जात होता. तोमर राजांनी आपल्या राज्याचा मोहम्मद गझनीच्या हातून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांना यात यश आले नाही.
इ.सन् १०३८ ते इस. १०९५ या काळात दिल्ली राज्याने अनेक अनुभव अनुभवले. मोहम्मद गझनीचा मुलगा मसूदने हांसी वर आक्रमण करून ते ताब्यात घेतले. मसूदचा मुलगा मजदूदने थानेश्वर जिंकून आपल्या ताब्यात घेतले. आणि तोमर यांची राजधानी दिल्लीवर आक्रमण करण्यासाठी तयारी सुरू केली. असे वाटू लागले होते की मुसलमान दिल्ली राज्य समाप्त केल्याविना आता गप्प बसणार नव्हते. मात्र तोमर राजांनी गजनीच्या आक्रमणाचा धाडसाने सामना करण्यासाठी तयारी सुरू केली. तोमर राजवंशातील महीपाल तोमर या राजाने सैन्याची जमवाजमव करून गजनीच्या आक्रमणाला मोडून काढण्याची तयारी सुरू केली.
महीपाल तोमर यांनी फक्त हांसी आणि थानेश्वर येथील किल्लेच जिंकून घेतले नाहीत, तर सैन्याने कांगडा येथे सुद्धा आपले विजयी निशान फडकावले. तंवरांनी इतका भीम पराक्रम केला होता, की गजनीचे भाग्यच बलवत्तर म्हणून तंवरांच्या हातून लाहोर शहर ताब्यात घेणे थोडक्यात वाचले.
तंवरांच्या या विजयाचे त्या काळी कौतुक व्हायला हवे होते, मात्र झाले उलटेच. तंवरांच्या या विजयाने राजपुतान्यात विद्वेषाग्नी भडकला गेला. तोमरांवर आजुबाजुच्या राजपुतान्यातील राज्यांचे आक्रमणे वाढू लागली. तंवरांनी या आक्रमणाला यथोचित यथाशक्ति उत्तर दिले. विक्रम संवत् ११८९ (सन् ११३२) मध्ये श्रीधर कवी यांच्या पार्श्वनाथचरित् ग्रंथावरून असे लक्षात येते की, तंवर साम्राज्याच्या वेळी त्यांच्या राज्याची राजधानी असलेले दिल्ली ही त्या काळात समृद्ध नगरी म्हणून ओळखली जात होती. तेथील तंवर राजे अनंगपाल तंवर आपल्या शौर्य आणि इतर गुणांनी सर्वत्र विख्यात असलेले राजे होते.
अनंगपाल तंवर द्वितीय यांनी मेहरोली येथे लोखंडी स्तंभावर स्तंभलेख लिहून त्याची दिल्लीत स्थापना केली होती. बिजलियाँ शिलालेखावरून बीसलदेव चौहान (विग्रहराज चतुर्थ) ने विक्रम संवत् १२०८ (सन् ११५१ ईo) मध्ये तंवरांना हरवून दिल्लीवर त्यांचे निशान फडकावले. त्या नंतर तंवर राजे हे चौहान राजांचे मांडलिक राजे म्हणून दिल्लीत राज्य करू लागले. पृथ्वीराज चौहान यांच्या दिल्लीतील पराभवा नंतर दिल्लीवर मुसलमान राजवटीला सुरुवात झाली.
फिरोजशाहा तुगलक याच्या राजवटीच्या काळात ग्वाल्हेरवर तंवरांच्या एका दुसर्‍या शाखेने राज्य प्रस्थापित केले. यानंतर ग्वाल्हेर येथे जवळपास १५० वर्ष तंवरांचे राज्य होते.
राजा रामसाह तंवर यांनी हल्दीघाटी युद्धात राजा महाराणा प्रताप यांना मदत केली होती. हल्दीघाटीच्या या प्रसिद्ध युध्दात लढताना रामसाह तंवर आणि त्यांचे दोन जवान मुले शहीद झाले. ग्वाल्हेर येथील तंवरांनी कला, साहित्य आणि संस्कृतिच्या सरंक्षणासाठी खूप मोठे कार्य केले होते.
दिल्ली येथे तंवरांच्या पराभवा नंतर तोमर/तंवर राजपूत वेगवेगळ्या दिशांनी विखुरले गेले. यातील एका तंवर शाखेने उत्तरी राजस्थान मधील पाटन भागात जाऊन आपले राज्य स्थापित केले. ज्याला जयपूर राज्याचा एक भाग समजले जात होते. सध्या या भागाला 'तंवरवाटी' अथवा 'तोरावाटी' अशा नावाने ओळखले जाते. सध्या सुद्धा या भागात तंवरांची ठिकाणे आहेत. यातील मुख्य ठिकाण मात्र पाटण हेच आहे.
तंवरांची दुसरी एक शाखा चंबळ भागात गेली, तिला 'तोमर राजपूतो की बसापत' म्हटले जाते. तंवरांच्या या बसापतीत (वसाहतीत) १४०० गावांचा समावेश आहे. या क्षेत्राला (परिसराला) तंवरघार या नावाने ओळखले जाते. तंवरांच्या या शाखेने अनेक पिढ्या ग्वाल्हेरवर राज्य केले. पश्चिमी उत्तर प्रदेश आणि हरियाणा या भागात सुद्धा तोमरांचे राज्य होते. तिथे आज सुद्धा तोमर/तंवर राजपूत खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.
पश्चिमी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद जिल्ह्य़ात असलेल्या पिलखुवा भागात तोमर/तंवर राजपूतांची 84 गावे आहेत. यात मुकीमपुर गढ़ी सुद्धा आहे. ज्यांनी 1857 च्या उठावात भाग घेतला होता. यामध्ये तंवरांचे अनेक लोक शहीद झाले होते. गढ़मुक्तेश्वर जवळ सुद्धा तंवरांची 42 गावे आहेत.
राजा अनंगपाल तंवर यांचा एक मुलगा भद्रसेन तंवर याने गढ़मुक्तेश्वर येथे येऊन अहिरांचा हा भाग जिंकून घेतला होता. आणि येथे भदस्याना नावाचे एक गाव बसवले होते. या गावापासून भैना, धौलपुर, लिसडी असे अनेक गावांचे निर्माण होऊन आज मितिला ही संख्या 42 गावांची आहे. मेरठ जवळ सुद्धा तोमर/तंवरांची 12 गावे आहेत. यामध्ये सिसौली, मऊ ख़ास, पंचगांव अशा नावाची ही गावे आहेत.
बुलंदशहर जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवरांची 24 गावे आहेत. गुलावठी आणि सिकंदराबाद यांच्या मध्ये असलेलेले बराल हे तोमर/तंवर यांचे एक प्रमुख गाव आहे. खुर्जाच्या जवळ सुद्धा तोमर/तंवर यांची धरपा सहीत 5 गावे आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ,तोमर/तंवर/तौर यांच्या लोकांना एका शेजारी अनेक गावांच्या वसाहती तयार करून राहण्याची जुनीच सवय आहे. अथवा ही त्यांची संस्कृती आहे असेच म्हणावे लागेल.
पश्चिमी उत्तर प्रदेशात तोमर/तंवर यांची आडनाव बदलून राहाणारी दुसरी एक शाखा आहे. या शाखेला जंघारा अशा नावाने ओळखले जाते. या शाखेचा इतिहास खूप गौरवशाली आहे. ज्यांनी अनेक वर्षापर्यंत आत्ताच्या रोहिल्लखंडात मुस्लिम शासकांच्या विरोधात टक्कर घेतली होती. जंघारा (तंवर) यांनी मुसलमान राजवटीला कधी सुखाची झोप लागू दिली नव्हती. दिल्लीतील पराभव झाल्यानंतर काही तोमर/तंवर यांनी रोहिल्लखंडातील अहीरांना पिटाळून येथे राज्य प्रस्थापित केले होते.
जंघारा या शब्दाचा अर्थ 'जंग के लिए भूखे' असा आहे. हा खूप मोठा लढाऊ वंश आहे. यामुळे रोहिलखंडात राहाणाऱ्या तंवर या वंशाला जंघारा हे नाव पडले आहे.  तंवर वंशातील जंघारा आडनावाने राहाणारे लोक बरेली, शाहजहाँपुर, बदायूं, एटा, फर्रुखाबाद आदी भागांत खूप मोठ्या संख्येने बघायला मिळतात. अलीगढ़ भागात सुद्धा जंघारा (तंवर) यांची 42 गावे आहेत.
या व्यतिरिक्त आगरा, फीरोजाबाद आदि जिल्ह्य़ात सुद्धा तोमर/तंवर राजपूत मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. हरियाणा राज्यातील भिवानी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तंवर राजपूत बघायला मिळतात. ज्यांना 'जाटू तंवर' नावाने ओळखले जाते. मेवाड़च्या सलुंबर ठिकाणच्या राजाने तंवर राजपूतांच्या हातून युद्धात ज्या मुण्डकटी आणि सिरकटी केल्या, त्या बदल्यात तंवरांना अनेक गावे जहागीरीमध्ये दिली गेली. त्या गावापैकी बोरज, तंवरान, सलुम्बर अशी काही तंवरांच्या जहागीरीतील गावे आहेत.
काही तोमर/तंवर राजपूतांनी दुसर्‍या जातीतील स्त्रिया ठेवल्याने, त्यांच्या संबंधातून तोमर वंश हा जाट, गूजर आणि अहीर अशा जातीत सुद्धा विभागाला गेला. जाट लोकात असे अनेक उप आडनावे आहेत, जे की स्वतःला तोमर/तंवर मानीत आहेत.
यामध्ये पिलानिया, नैन, मल्लन, लाम्बा, खटगर, खरब, ढंड, भादो, खरवाल, सोखिरा, रोनिल, सकन, बेरवाल आणि नारू अशा आडनावाचा समावेश आहे. हे लोक पूर्वी तोमर वा तंवर उप आडनाव वापरत नव्हते. मात्र यांच्यातील बहुतांश लोक स्वतःचे गोत्र आता तोमर वा तंवर लावू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील बड़ौत भागातील सलखलेन् जाट सुद्धा स्वतःला सलखलेन् तोमर यांचे वंशज सांगताना दिसत आहेत. हे लोक स्वतःला अनंगपाल तोमर यांच्या वंशातील असल्याचे सांगत असून आता ते स्वतःला तोमर/तंवर म्हणवून घेवू लागले आहेत.
गुजर लोकात सुद्धा तोमर राजपूतांचे अवशेष बघायला मिळतात. खटाना गूजर हे स्वतःला तोमर/तंवर राजपूतांमधून निर्माण झाल्याचे मानत आहेत. तर ग्वाल्हेर जवळ टोंगर गूजर आहेत, जे स्वतःला ग्वाल्हेरचा राजा मान सिंह तोमर यांची गूजरी राणी मृगनयनी हिचे वंशज मानतात. ज्यांना गूजरी (ठेवलेली) मातेची संतान असल्या कारणाने राजपूतांनी स्वीकार केले नव्हते.
दक्षिणी दिल्लीत सुद्धा तंवर गूजर यांची गावे आहेत. मुस्लिम शासनकाळात जेव्हा तोमर/ तंवर राजपूत दिल्लीमधून निष्काषित होऊन इतरत्र राज्य करण्यासाठी गेले मात्र काही तोमर राजपूतांनी गूजर बनून मुस्लिम राजवटीच्या अधीन राहणे स्वीकार केले. ते हे आजचे दिल्लीतील तंवर-गुजर आहेत. हरियाणा मधील अहिर मध्ये सुद्धा दयार गोत्र पाहायला मिळते. जे स्वतःला तोमर/तंवर राजपूत वंशातून निघालेले मानतात.
*दिल्लीतील तोमर/तंवर राजे
दिल्लीतील तंवर(तोमर) राजे
(736-1193 ई)
अनंगपाल तोमर (प्रथम)
(736-754 ई)-
अनंगपाल तोमर हे दिल्लीचे तंवर/तोवर वंशातील संस्थापक राजा होते. ज्यांना बीलनदेव, जाऊल अशा अनेक नावाने ओळखले जात होते.
राजा वासुदेव तंवर
(754-773)
राजा गंगदेव तंवर
(773-794)
राजा पृथ्वीमल तंवर
(794-814)
राजा जयदेव तंवर
(814-834)
राजा नरपाल तंवर
(834-849)
राजा उदयपाल तंवर
(849-875)
राजा आपृच्छदेव तंवर
(875-897)
राजा पीपलराजदेव तंवर
(897-919)
राज रघुपाल तंवर
(919-940)
राजा तिल्हणपाल तंवर
(940-961)
राजा गोपाल देव तंवर
(961-979)-
यांच्या काळात साम्भर येथील राजा सिंहराज आणि लवणखेडा येथील (तोमर राजाचे) मंडलिक राजा सलवण यांच्यात युद्ध झाले. या युध्दात सलवण मारला गेला. त्यानंतर दिल्ली येथील राजा गोपाल देव तोमर याने सिंहराजवर आक्रमण करून त्याला युद्धात कापून काढले.
सुलक्षणपाल तोमर
(979-1005)
जयपालदेव तंवर
(1005-1021)
कुमारपाल तंवर
(1021-1051)
लियाअनगपाल द्वितीय (1051-1081)
तेजपाल प्रथम (1081-1105)
महिपाल
(1105-1130)
विजयपाल
(1130-1151)
मदनपाल अथवा अनंगपाल तृतीय
(1151-1167)
अनंगपाल तृतीय यांच्या काळातील अजमेर येथील प्रतापी शासक विग्रहराज चौहान उर्फ़ बीसलदेव यांनी दिल्ली राज्यावर आक्रमण करून आपला अधिकार जमवला आणि तह करून मदनपाल तोमर यालाच दिल्लीचा राजा राहून दिले. मदनपाल तंवरने बीसलदेव चौहानच्या संगतीने तुर्कोंच्या विरुद्ध युद्ध केले आणि त्यांना पिटाळून लावले.
पृथ्वीराज तोमर
(1167-1189)
चाहाडपाल/गोविंदराज तंवर
d(1189-1192)
तेजपाल द्वितीय तंवर
(1192-1193 ई)



 

for more info contact 
धिरजसिंह रवींद्र तौर
प्लो नो १३ अयोद्ध्यानगर
अंबड रोड जालना
९४२१४५७९५२


शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड
राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   
९९७०१९५१५६
https://www.google.com/maps/d/edit?mid=11vAiQ_4ATdjHoIkbiQkOd4lCbi1TufQq&usp=sharing

Friday, December 25, 2015

जीवन एक चक्र आणि आजची असहिष्णुता

तर मित्रांनो या जीवनात काय काय होऊ शकते याची कल्पना आपल्याला येतच असते 
तरी जीवन हे एक चक्र आहे ते कोणासाठीही थांबत नाही पण त्यात असे काय होऊ शकते कि ज्याने चक्र चालू राहते

याबद्दल मनातील  विचार या ठिकाणी मांडतो आहे
कल्पनेच्या विश्वात आमची मजल तुम्हाला अर्पण

सुरुवात कशी झाली हे प्रत्येक जण सांगतो आपापल्या परीने
तरी आमच्या पुराणात (माणसाची गोष्ट ) सांगितल्या प्रमाणे वात शीला आणि जल यांच्या नंतर जीववरण तयार झाले

या जीवांना कसे जगावे हे शिकवण्यासाठी काही तुमच्या आमच्या सारख्याच कल्पना करू शकणाऱ्यां जीवांनी
औम कारापासून तर नृत्य , गायन वादन अशा 64 कला पर्यन्त आणि 7 तत्व आणि 4 वेदांपासून ते 4 वादांपर्यंत (साम दाम दंड भेद )
तसेच knowlegde पासून तर physics ,chem. , maths , bio, electron ,proton etc . सर्व तयार केले

याचाच वापर करत करत सामान्य जीव
पुढे चालून हेच जीव विकसित झाले (जसे आपण माकडापासून ,कार्टून नेटवर्क वर  digimon, pokemon होतात ना तसेच  ) आणि ते पुढेही चालूच राहील (जसे dragon ball zee मध्ये , x-men मध्ये,twilight saga मध्ये  इत्यादी) 
पण माणसाला नेहमीच आकर्षण असते ते इतरांपेक्षा वेगळे बनण्याची आणि म्हणूनच
दशावतार ,विष्णूपुराण , justice league, avengers यासारखे नवीन कार्यक्रम ह्याच कल्पना विश्वात रमणाऱ्या जीवांनी तयार केले पण त्याचा परिणाम असा झाला कि सामान्य जीव त्याचाही वापर करू लागले आणि नकळत हेच जीव स्वतःचाच ह्रास करून घेऊ लागले

आणि नियमानुसार जसे आले ते तसे परत जाणार     जीव , जल, शीला, वात हे आपल्या सर्वाना माहिती आहे पण आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही ये म्हणूनच कि काय जर निर्माता असेल किंवा नसेलही तरी याच जीवांना काही कारण हवे असते अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणूनच यांनी सूरअसुर ,देवदानव ,सूर्यवंशी चंद्रवंशी ,ब्रम्हवंशी ,नागवंशी, हिंदू , मुस्लिम  दक्षिणउत्तर पूर्वपश्चिम तयार केले

आणि यात सामान्य जीवांची काय चूक कि त्यांनी याचाच वापर करून सर्वव्यापी जगाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष तुकडे करून घेतले

पण पुढे चालून अशी जीवही तयार झाली ज्यांच्या जिव्हाळ्याने म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा कल्पना सोडून न देता खरेखुरे साहित्यही याच कल्पनारम्य जीवांनी व्यक्तीचरीञ्यालाही कल्पनेची जोड देत रामायण ,महाभारत , बायबल, कुराण हे परिस्थिती नुसार  बदलत आणले

काही नग तर असेही निघाले
की एरवी एखाद्या भटाप्रमाणे तुम्ही आम्हाला सोडुन त्यांना मान का देता असे म्हणणारे हेच literal intelligentsia (बुद्धिजीवी हो !!!) जीव
धोक्यात घालुन दादरीच्या घटनेचा संबंध दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येशी लावतात आणि पुरस्कार वापसी करतात
यातलेच काही सांगतात की औरंगाबाद ला संभाजीनगर करने म्हणजे ईतिहास बदलण्यासारखे आहे (नेमाडे )
माझी कल्पना मला दाखवते की चालुच राहील

आम्ही सर्वप्रथम या जगात आलो आणि आम्ही या क्षेत्रातील मुलनिवासी हेच ठरविण्यात सामान्य जीवांचा असतीत्वासाठी संघर्ष चालुच राहील

आणि हेच बुद्धीजीवी त्यांनी निर्माण केलेल्या(ते किंवा त्यांची अभिव्यक्ती कारण असलेल्या ) युद्धप्रसंगी रडतील की आम्हाला मान मिळत नाहीये येथे असहिष्णुता (intolerance )वाढतेय  पण ते हे विसरतात की जर दोन प्रदेशांत युद्ध चालले असेल तर अभिव्यक्ती दडपली जाणे सहाजीक आहे यात विशेष काही नाही (when there was war started no one comes to see my shows hence I cremated my theater

ref. Film hugo of hollywood just watch for this  message

त्या माणसाला स्वतःच्या थिएटर ला आग लावावी लागली कारण युद्धामुळे  त्याला आणि त्याच्या कलेला मान मिळत नव्हता पण त्याने आजच्या बुद्धीजीवींप्रमाणे कधीच युद्धाला प्रसिद्धीसाठी हत्यार बणविले नाही )
असो

....
जर खरेच अभिव्यक्ती  माणसाला जगवत चलवात असेल तर एवढे ध्यानी ठेवावे की
पुढे चालुन तुमच्या हातांनीच देव आणि त्यांचेही युद्ध घडतील (x-Men  series मध्ये पुढच्या चिञपटात राम होता आणि स्वतःला कृष्णा सांगणारा खलनायक दाखवणार आहे असे म्हणतात हीच का ती अभिव्यक्ती 

काय भरोसा पुढे चालुन avengers त्याच दिशेने वळाले तर )

येथे एक मुद्दा अजुन येतो की जर ती अभिव्यक्ती नसुन संशोधन आहे

म्हणजे आपल्याच पुराणांचे english मध्ये decoding (आवृत्तीकरण
उदा. चंद्रवंशी आणि सुर्यवंशीच vampires आणि warewolf आहेत का???)किंवा एखाद्या सर्वव्यापी अपघातानंतर (जगबुडी , हिमयुग ) जगासमोर हीच अभिव्यक्ती पुराण, ईतिहास म्हणुन जगासमोर येईल तेव्हा पुन्हा जीवनाचे चक्र सुरु होईल आणि पुन्हा सामान्य जिवांचा असतित्वासाठी संघर्ष (आम्ही जुने, आम्ही मुलनिवासी) चालुच राहिल

तोपर्यंत जोपर्यंत जगात जिव आहेत आणि कदाचीत बाकी आवरणांचेही चक्र असेलच

संशोधन चालु आहे

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर 
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम