Wednesday, September 9, 2015

राजे राज्य तेव्हाच करतील जेव्हा मावळ्यांमध्ये जिव्हाळा असेल

       


        या दंडकारण्यात अनेक राजे जन्मले आणि राज्य करून त्यांच्या गोष्टी ,कहाण्या मागे सोडून गेले
पण तरीही फार क्वचितच आहेत जे सर्वांच्या मनात घर करून गेले .
        साम ,दाम, दंड, भेद  या माणसाने व्यवहारासाठी आखून ठेवलेल्या रेषा आहेत.
या दंडकारण्यात दामाने व्यापारी आणि भेदाने पुजारी राज्य करून गेले, दंड या राज्याचा पाया आहे म्हणून दंडाचे राज्य चालूच राहील, पण जो येथे सामावादासाठी संवाद साधतो त्याची गरज नेहमीच राहिली आणि राहीलही.  
       तसेच दंडाने आणखी एक गोष्ट साध्य झाली आहे ती म्हणजे उठाव , सत्तेत असणाऱ्या विरुद्ध उठाव करणाऱ्यांची येथे कधीच उणीव भासली नाही म्हणजे दंडकारण्य बदलास कारणीभूत ठरते. पण जर आजच्या जगाची गोष्ट असेल तर लोक आता तुमच्या मागे किती आहेत या पेक्षा तुमच्या सोबत किती आहेत हे बघतात आपल्यासारखे जीव निर्माण करण्याची जाणीव आपल्याला  निर्मात्याने दिली आहे पण आपल्यासारखे माणसे निर्माण करण्याची जाणीव आज आपल्याला नसावी हि बाब  तर्कशास्त्रात बसत नाही विचारांनी भाजी भाकरी मिळत नाही त्यासाठी कष्टच  करावे लागतात हि गोष्ट जरी खरी असली तरी माणसाने कसे आणि कशासाठी जगावे हे शिकवणे गरजेचे होते म्हणून या रूढी, प्रथा ,परंपरा जिवनात आल्या तरीही वाईट जुन्या चालीरीती टाकून देऊन नवीन रिती शिकणे तसेच आदर्श गोष्टी पुढे चालू ठेवणे म्हणजे प्रबोधन,प्रबोधन हि एक आवर्त संकल्पना आहे जसे विज्ञानात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नाही तसेच प्रबोधनहि कधी थांबणार नाही.  आज आपण global village हि संकल्पना ऐकतो तेव्हा आपण असे मानू कि आज जगाला जोडणारे जगाचे राजे आहेत भले प्रत्येक देश स्वतःच्या राजाला प्रधानमंत्री , हुकुमशहा,राजा, सम्राट काहीही उपमा देवोत पण जर त्यांनी जगाशी संबंध तोडण्याचे प्रयत्न केले तर त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद आता सर्वसामान्यामध्ये आज आहे आणि जरी राजेशाही पुन्हा आली तरी राज्यक्रांतीला सोबत घेऊनच येईल
म्हणून जर सर्व जनतेत राजाबद्दल जिव्हाळा असेल तोवर तो राजा राहील
आज एवढेच
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव  तालुका: माजलगाव  जिल्हा: बीड  राज्य :महाराष्ट्र  देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम   

      

Tuesday, August 25, 2015

माणसाची गोष्ट

माणसाची गोष्ट

         माणूस माकडापासून विकसित झाला असे बरेच विद्वान म्हणतात . तो विकसित होताना त्याच्यामध्ये अनेक  बदल झाले ,ते कशा रीतीने झाले हे मांडण्यासाठी हा लेख .
           माणूस अगोदर एकटा होता म्हणून जगणे आणि उपजणे एवढेच त्याचे काम . पुढे तो विचार करू लागला पण एकांतात ,आपल्यासारखाच कि जग कसे निर्माण झाले असावे आपण कसे जगतो आहे वगैरे वगैरे(तो विचार कसा करू लागला हा संशोधनाचा विषय आहे असो ) प्रथम तो एकटाच विचार करत असे म्हणून अनुभव(experience ) आणि स्मृती (memory )यांच्या  जोरावर त्याने जगणे वाढवले  पुध्ये एकासमोर एक असे अनेक विचार करणारे एकत्र आले आणि संभाषण कौशल्यांची निर्मिती झाली सुरुवातीला अमौखिक अलिखित (हातवारे, हालचाली ) नंतर मौखिक (बोलीभाषा) पुढे चीन्हांपासून लिखित संभाषण आणि आज  मौखिक  लिखित (speech to  text ) संभाषणापर्यंत मानव आला आहे.
    पण प्रथम माणसे जेव्हा संभाषण करत तेव्हा ते आपल्या जीवनातील काहीच पण प्रभावी प्रसंग मांडत असत . त्यामुळे माणसे जिवांतील सर्व प्रसंग क्वचितच मांडू शकत पण जीवनातील रहस्यमय प्रसंग म्हणजे आपण केलेले प्रवास आणि म्हणून पुढे प्रवासवर्णनांची भर पडली. पण प्रसंग आठवून तो सांगणे म्हणजे सांगणाऱ्याची भाषा ,त्याचा बघण्याचा दृष्टीकोण याचा प्रभाव त्यात असे. आणि त्याचे प्रत्येक वेळी वक्त्यानुसार पुनर्न्विकरण  व्हायचे(randome access memory) , म्हणून पुढे तंतोतंत माहिती प्रसारासाठी लिखित म्हणजे (read only memory) साहित्य ज्याला आज शास्त्र , वेद ,वांग्मय  अशा नावांनी संबोधले जाते त्याची सुरुवात झाली असावी . त्यातही प्रभावी प्रसारासाठी लिखित साहित्याकडून चित्रकलेकडे विचारवंत माणसे वळली .
  तसेच पुढे चालून या चित्र कलेचेच रुपांतरण चलत्चिञ म्हणजे चित्रपटात झाले  आज video पाहणे,पाठवणे, आणि बनमाहिविणे सहज सोपे झाले आहे म्हणून माहिती प्रसार वेगाने होत  
  तरीही अभ्यासक म्हणून विचार केला तर लक्षात येते की हे माध्यम जरी प्रखर आहे पण त्यातील ञुटी लक्षात येतील अशा आहेत 
   उदा. प्रत्येक माध्यम privacy(वैयक्तिक जीवन जगण्याची मुभा ,गुप्तता ) आणि piracy ( चाचेगिरी) ह्या ञूटींचा सामना करत असते पण इथे प्रभाव थोडा जास्तच आढळतो आणि चित्रपटमाध्यमाला लागते ती silicon semiconductor ne बनलेली मेमोरी ह्यात जशी माहिती साठवली जाते तितक्याच सहजतेने ती मिटवली पण जाते 
   म्हणजे कागदावर साठवलेल्या माहितीपेक्षा याची जास्त काळजी घेण्याची गरज असते आणि सुरक्षितता कमी आहे तरीही या प्रखर माध्यमाचा वापर केला जावा आणि यातुन जमा झालेल्या माहिती सर्वांना उपलब्ध असावी यापासुन कोणालाच वंचित ठेवण्याची अपेक्षाही ठेवु नये 
  जय हिंद!!! जय महाराष्ट्र !!!